पुणे : ‘‘जिल्ह्यात रोजगार हमी योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी किसान सभेतर्फे जिल्ह्यातील चार तालुक्यातून बुधवारी (ता.७) पदयात्रा सुरू करण्यात आली. आंबेगाव तालुक्यातील भिमाशंकर, जुन्नरमधील शिवनेरी किल्ला पायथा येथून पदयात्रा सुरू झाली आहे. आज (ता.८) खेड बस स्थानक व शिरूरमधील वडगाव रासाई येथून सकाळी दहा वाजता ही पदयात्रा सुरू होईल’’, अशी माहिती किसान सभेचे अमोल वाघमारे यांनी दिली.
किसान सभेचे सुरू केलेल्या या पदयात्रेत आखिल भारतीय किसान सभेचे पुणे जिल्हाध्यक्ष नाथा शिंगाडे, उपाध्यक्ष विश्वनाथ निगळे, अमोल वाघमारे, राजू घोडे, संतोष कांबळे, दत्तू बर्डे, अमोल गरूड यांच्यासह मजूर सहभागी झाले आहेत. ही पदयात्रा उद्या (ता.९) पुणे जिल्हाधिकारी कार्यालय येथे पोहचणार आहे.
वाघमारे म्हणाले,`` कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागातील हातावर पोट असलेल्या कामगार आणि विशेषत आदिवासी पट्यातील मजुरांची परवड होत आहे. काम नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ येत आहे. त्यांना मनरेगा अभियानाअंतर्गत काम मिळावे, यासाठी किसान सभेतर्फे मे २०२० मध्ये घोडेगाव (आंबेगाव) येथे आंदोलन करण्यात आले होते. ’’
प्रमुख मागण्या
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.