नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरीव मदत देण्यात यावी

पावसामुळे संत्रा, मोसंबी, सोयाबीन, कपाशी, तूर यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना भरीव मदत देण्याबाबत माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांना निवेदन देऊन शेतकऱ्यांनी अपेक्षा व्यक्त केली आहे.
Massive relief should be given to the affected farmers
Massive relief should be given to the affected farmers

जलालखेडा, जि. नागपूर : खरीप हंगाम सन २०२१-२२ ला सततच्या पावसामुळे संत्रा, मोसंबी, सोयाबीन, कपाशी, तूर यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना भरीव मदत देण्याबाबत माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांना निवेदन देऊन शेतकऱ्यांनी अपेक्षा व्यक्त केली आहे. 

खरीप हंगाम २०२१-२२ ला सततच्या पावसामुळे सोयाबीन पीक शेंगा भरल्यानंतर सोयाबीनला कोंब फुटून सडल्यामुळे शेतकऱ्यांचे जवळपास १०० टक्के नुकसान झाले आहे. त्याचप्रमाणे कपाशीचे बोंड जवळपास ६० टक्के सडले. त्यामुळे कपाशीचे पण ६० टक्के नुकसान झाले आहे. जिल्ह्यात संत्रा व मोसंबी मोठ्या प्रमाणात आहे. या वर्षी संत्रा व मोसंबीमध्ये ऑगस्ट, सप्टेंबर व ऑक्टोबरमध्ये बुरशीमुळे जवळपास ६० टक्के गळ झाली आहे. त्यामुळे नागपूर जिल्ह्यातील शेतकरी हवालदिल झाला आहे. जिल्ह्याचा सर्वे होऊन प्रति हेक्टरी ५० हजार रुपये मदत देण्याची मागणी करण्यात आली आहे. मागच्या वर्षी २०२०-२१ ला पण सोयाबीनवर रूट रॉट व येलो मोझॅक या बुरशीमुळे या जिल्ह्यातील सोयाबीन भरले नव्हते. 

त्याचप्रमाणे अतिवृष्टीमुळे या क्षेत्रातील मोसंबीमध्ये ब्राऊन फूट रॉट या बुरशीने जवळपास ७० टक्के नुकसान झाले होते. या नुकसानीचा राज्य शासनाने सर्वे केला होता. कृषी सचिव एकनाथ डवले यांनी पण या सोयाबीन व मोसंबी गळच्या क्षेत्राला भेट दिली होती व सर्वेचा आदेश दिला होता. सर्वेक्षण होऊन अहवाल पाठवून निधीची मागणी ही राज्य शासनाला करण्यात आली होती. पण लगतच्या अमरावती जिल्ह्याला सोयाबीन व संत्रा व मोसंबी गळकरिता अनुदान देण्यात आले. पण नागपूर जिल्ह्याला अजून मदत मिळाली नाही. त्यामुळे नागपूर जिल्ह्यातील शेतकरी असंतुष्ट आहे.

अंमलबजावणी व्हावी!  शरद पवार यांनी १४ नोव्हेंबर २०२० ला जिल्ह्यात ओला दुष्काळ पाहणी दौरा केला होता. त्यानंतर रविभवन येथे संत्रा व मोसंबीच्या शेतकऱ्यांसोबत संवाद साधून या पिकाच्या अडचणीबद्दल व मार्केटिंग बद्दल चर्चा करताना चीनमध्ये संत्रा विकता येईल म्हणून सांगितले होते. याकरिता एक संत्र्याची कमेटी करण्याकरिता सांगितले. पण त्यानंतर कोरोना आल्यामुळे तो प्रश्‍न प्रलंबित आहे व कमेटी पण झाली नाही. तरी यावर संत्रा व मोसंबी या फळपीकमध्ये काम करण्याऱ्यासोबत पुन्हा चर्चा करून तोडगा काढावा, अशी ही मागणी निवेदनात नागपुरी संत्रा कंपनीचे अध्यक्ष मनोज जवंजाळ, सचिव स्वप्नील धोटे यांच्यासह डॉ. अनिल ठाकरे, भूपेंद्र चरडे, अनुप खराडे यांनी केली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com