औरंगाबाद : मराठवाड्यातील सात जिल्ह्यांतील १००३ गावांमध्ये शेतीपिकाचे जुलै अखेरपर्यंत नुकसान झाल्याची माहिती प्राथमिक अंदाजात समोर आली आहे. जवळपास १ लाख ५८ हजार ८४५ शेतकऱ्यांच्या १ लाख १५ हजार ६६२ हेक्टर ७१ गुंठ्यांवरील शेतीपीक बाधित झाली असल्याची माहिती प्रशासनाच्या सूत्रांनी दिली.
मराठवाड्यातील औरंगाबाद वगळता सर्वंच जिल्ह्यांतील शेतीपिकाचे जून, जुलैमध्ये आलेल्या अतिपावसाने व पुरामुळे नुकसान झाले आहे. नुकसान झालेल्या गावांमध्ये जालन्यामधील ७९, परभणी २४२, हिंगोली ७८, नांदेड ५६३, बीड १५, लातूर १४, तर उस्मानाबाद जिल्ह्यातील १२ गावांचा समावेश आहे. जालन्यातील १४ हजार ८१०, परभणीतील ४६ हजार २५०, हिंगोलीतील ४२९४, नांदेडमधील ९२ हजार ३५३, लातूरमधील ७०४, तर उस्मानाबादमधील ४३४ शेतकऱ्यांना नुकसानीची झळ पोहोचली आहे. या शेतकऱ्यांच्या नुकसान झालेल्या क्षेत्रात १ लाख १३ हजार ९४९ हेक्टर १ गुंठ्यावरील जिरायती, १५९६ हेक्टर ६० गुंठ्यांवरील बागायती, तर ११७ हेक्टर १० गुंठ्यांवरील फळपिकांचा समावेश आहे.
सर्वाधिक नुकसान नांदेड जिल्ह्यात तर त्यापाठोपाठ परभणी, जालना, हिंगोली, बीड, लातूर, उस्मानाबाद आदी जिल्ह्यांचा नुकसानीत क्रमांक लागतो. प्राथमिक नुकसानीनुसार बाधित क्षेत्रासाठी जिरायती ६८०० रुपये, बागायती १३५०० रुपये, तर फळपिकांसाठी १८ हजार रुपये हेक्टरी मदत देण्यात येते. शासनाच्या निकषाचा व झालेल्या नुकसानीचा विचार करता जिल्हानिहाय एकूण अपेक्षित निधीत जालना जिल्ह्यात ५ कोटी १६ लाख, परभणी २३ कोटी ५७ लाख, नांदेड ४८ कोटी १४ लाख बीड ८९ लाख, लातूर ३१ लाख, तर उस्मानाबाद जिल्ह्यात १२ लाख ७५ हजार रुपयांच्या निधीची गरज लक्षात घेता ७८ कोटी २२ लाखांवर निधीची गरज असेल, असे प्रशासनाच्या प्राथमिक अंदाजात नमूद करण्यात आल्याचे प्रशासनाच्या सूत्रांचे म्हणणे आहे. जिल्हानिहाय नुकसानीचे क्षेत्र (हेक्टरमध्ये)
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.