
गडचिरोली ः वीज वितरणचे वरिष्ठ अधिकारी कृषिपंपाला २४ तास वीजपुरवठा देण्यास टाळाटाळ करीत आहेत. परिणामी, शेतकरी सिंचन करण्यास असमर्थ ठरत आहेत. या विरोधात शेतकरी व शिवसैनिक पोलिसात तक्रार दाखल करतील, असा इशारा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुरेंद्रसिंग चंदेल यांनी दिला.
वितरणचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंगल व गडचिरोली, चंद्रपूरचे मुख्य अभियंता देशपांडे यांच्या विरोधात आदिवासी व इतर शेतकऱ्यांच्या कृषिपंपाला कमी कालावधीसाठी वीजपुरवठा दिला जात असल्याचा शिवसेनेचा आरोप आहे. तालुक्यातील गेवर्धा फिडरमध्ये शेतकऱ्यांना २४ तास वीजपुरवठा द्यावा, म्हणून हजारो शेतकऱ्यांच्या माध्यमातून आंदोलन करुण निवेदन देण्यात आली.
कृषिपंपांचे थकीत बिल भरण्याचे आवाहन केल्यानंतर त्याला प्रतिसाद देत १४ लाख रुपयांचा भरणा करण्यात आला. त्यानंतर देखील शेतकरी हिताचा एकही निर्णय घेण्यास वीज वितरण कंपनीला यश आले नाही. २४ तास वीजपुरवठा करण्यास देखील वीज कंपनी असमर्थ ठरली आहे.
हा प्रामाणिक शेतकऱ्यांवर अन्याय असल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे. या विरोधात तक्रार दाखल करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला. दिवाळीनंतर विजय सिंगल व देशपांडे यांचा पुतळा तयार करून त्यांचा निषेध करणार असल्याचेही चंदेल यांनी सांगितले.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.