परभणी, हिंगोली जिल्ह्यात काढलेले सोयाबीन पीक पाण्यात

परभणी : दोन, तीन दिवासांच्या उघडीपीनंतर बुधवारी (ता.३०) दुपारी साडेतीन ते चार वाजण्याच्या सुमारास जोरदार पाऊस झाला. त्यामुळे शेतामध्ये कापणी करुन ठेवलेले सोयाबीन पाण्यात बुडाले. त्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले.
Soybean crop in Parbhani, Hingoli district in water
Soybean crop in Parbhani, Hingoli district in water

परभणी : दोन, तीन दिवासांच्या उघडीपीनंतर बुधवारी (ता.३०) दुपारी साडेतीन ते चार वाजण्याच्या सुमारास जोरदार पाऊस झाला. त्यामुळे शेतामध्ये कापणी करुन ठेवलेले सोयाबीन पाण्यात बुडाले. त्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले.

परभणी, हिंगोली जिल्ह्यातील अनेक मंडळांतील सोयाबीनचे पीक काढणीच्या अवस्थेत आहे. त्यातच सततच्या पावसात ते भिजल्याने शेंगाना झाडावरच मोड फुटले. त्यामुळे दाण्यांची प्रत खराब झाली. गेल्या दोन, तीन दिवसांपासून पावसाने उघडीप दिली. त्यामुळे सोयाबीन काढणीच्या कामांनी वेग घेतला आहे.

परंतु, मजुरांच्या समस्येमुळे अनेक शेतकऱ्यांना कापणी केलेले सोयाबीन जमा करता आले नाही. बुधवारच्या पावसामुळे अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील कापणी केलेल्या सोयाबीनच्या शेताला तळ्याचे स्वरुप आले होते. पीक पाण्यात बुडल्याने खूप मोठे नुकसान झाले.

एकीकडे नुकसानीच्या पंचनाम्याची कामे सुरु आहेत. तर, दुसरीकडे पाऊस पाठ सोडत नसल्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. बुधवारी दुपारनंतर परभणी जिल्ह्यातील पिंगळी, लिमला, महातपुरी, सावंगी म्हाळसा, आडगाव, वालूर, कुपटा आदी मंडळात पाऊस झाला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com