
नगर : गत दोन वर्षात मोठ्या प्रमाणात झालेल्या अवकाळी पाऊस आणि उशिरा सुरू झालेल्या गळीत हंगामामुळे उसाला मोठ्या प्रमाणात तुरे आले आहेत. शेतकऱ्यांनी कष्टाने पिकविलेल्या उसाला तुरे आल्यामुळे वजनात घट होणार असून शेतकरी चिंतेत आहेत.
नगर जिल्ह्यातील राहाता, राहुरी, नेवासा, शेवगाव, श्रीगोंद्यासह सर्वच भागात मोठ्या प्रमाणात ऊस पीक आहे. ऊस हे शेतकऱ्यांना हमखास उत्पन्न देणारे नगदी पीक आहे. त्यामुळे ऊस पीक घेणाऱ्या शेतकऱ्याचे प्रमाण या भागात जास्त आहे. ऊस पिकाच्या उत्पन्नावरच शेतकऱ्याची वार्षिक तसेच आर्थिक घडी बसत असते. मात्र, गत काही वर्षात वातावरणातील प्रतिकूल बदलामुळे उसाला तुरा येण्याचे प्रमाण वाढले आहे. त्याचाच परिणाम म्हणून सद्यःस्थितीत जिकडे पहावे तिकडे उसाला तुरे आलेले दिसत आहेत.
तुरे आलेले उसाचे क्षेत्र अधिक असल्याचे दिसून येत आहे. उसाला तुरे आल्यामुळे उत्पादनासह वजनात घट होऊन आर्थिक फटका बसणार असल्याचे शेतकरी सांगत आहेत. तसेच खात्याचे खताच्या वाढलेल्या किमती, लोकरी मावा, हुमणी यामुळे शेतकरी पुरते हैराण झालेले आहेत. शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ झाली असून शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होणार आहे. तुरे आले असताना ऊसतोड होत नसल्याने उसाच्या वजनात घट होण्याचा अंदाज शेतकरी व्यक्त करत आहेत.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.