सांगली जिल्ह्यात तेरा साखर कारखान्यांकडून ४२ लाख उसाचे गाळप

सांगली ः जिल्ह्यातील साखर कारखान्यांकडून गाळपास गती आली आहे. तेरा साखर कारखान्यांनी ४२ लाख ६९ हजार टन उसाचे गाळप केले. तर ४५ लाख ७९ हजार साखरेचे उत्पादन घेतले आहे.
Thirteen sugar mills grind 42 lakh sugarcane in Sangli district
Thirteen sugar mills grind 42 lakh sugarcane in Sangli district

सांगली ः जिल्ह्यातील साखर कारखान्यांकडून गाळपास गती आली आहे. तेरा साखर कारखान्यांनी ४२ लाख ६९ हजार टन उसाचे गाळप केले. तर ४५ लाख ७९ हजार साखरेचे उत्पादन घेतले आहे. सर्वाधिक साखर दत्त इंडियाने उत्पादित केली आहे. तर सर्वाधिक साखर उतारा राजारामबापू पाटील (सर्वोदय) कारखान्याचा आहे.

जिल्ह्यात यंदा १ लाख २२ हजार हेक्टरवरील गाळपासाठी ऊस उपलब्ध आहे. यंदाच्या हंगामात १३ साखर कारखान्यांकडून हंगाम सुरु झाला आहे. त्यानुसार साखर कारखान्यांकडून गाळपाचे काटेकोर नियोजन होत आहे. अनेक साखर कारखान्यांनी गाळपास गती घेतली आहे. त्यामध्ये दत्त इंडियाने ५ लाख १० हजार टन उसाचे गाळप करत ५ लाख ३८ हजार साखरेचे उत्पादन घेतले आहे. 

कवठेमहांकाळ आणि आटपाडी तालुक्यांतील कारखान्यांनी गाळप हंगाम सुरू केला नाही. जत तालुक्यातील राजारामबापू पाटील (जत) युनिटने गाळप सुरू केले आहे. त्यांनी १ लाख ७० हजार टन उसाचे गाळप करत १ लाख ६३ हजार क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले. साखर उतार ९.६० टक्के इतका आहे.

जिल्ह्यातील दोन साखर कारखान्यांनी एक रकमी एफआरपी जाहीर केली. शेतकऱ्यांच्या खात्यावर ही रक्कम वर्ग केली आहे. मात्र इतर साखर कारखान्यांनी २६०० रुपये प्रमाणे पहिला हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केला आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com