नाशिक : दुर्गम व आदिवासी बहुल पेठ तालुक्यातील अनुकूल हवामान व मनुष्यबळाची उपलब्धता लक्षात घेता अळिंबी उत्पादनाकडे शेतकऱ्यांचा कल वाढत आहे. या शेतकऱ्यांचे उत्पादन गुणवत्तापूर्ण होण्यासाठी तालुक्यातील खिरकाडे येथे कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) व कृषी विभाग मेंठतर्फे अळिंबी उत्पादन शेतीशाळा घेण्यात आली.
बदलत्या हवामानात स्पर्धेच्या युगात शेतकऱ्यांनी पारंपरिक पद्धतीने शेती करताना शेतीपूरक व्यवसायही करावा. यासाठी ही शेतीशाळा घेण्यात आली. अळिंबी उत्पादन फायदेशीर शेतीपूरक व्यवसाय म्हणून उदयास येत आहे. यासाठी प्रशिक्षण कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे.
उत्पादनातील संधी व महत्त्व, अळिंबीचे प्रकार, वाणाची निवड, उत्पादनाची तंत्रशुद्ध प्रक्रिया, साहित्य व उत्पादन कक्षाचे निर्जंतुकीकरण, बेड तयार करणे, बेडमध्ये बियाणे टाकणे, कक्षाचे तापमान व आर्द्रता नियंत्रण, उत्पादन संकलन, प्रतवारी, पॅकिंग व प्राथमिक प्रक्रिया, विक्री व्यवस्था याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
मंडळ कृषी अधिकारी डॉ. श्रीरंग वाघ, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक सागर खैरनार, कृषी सहायक विकास गडाख, मशरूम उत्पादक शेतकरी पुंडलिक नाठे, शेतकरी नामदेव भोये, पुंडलिक नाठे, सोमनाथ ठाकरे, शेतकरी मित्र गजानन ठाकरे उपस्थित होते.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.