पुणे जिल्ह्यातील धरणांतील पाणीसाठा कमी होण्यास सुरुवात

पुणे जिल्ह्यातीलगेल्या काही दिवसांपासून उन्हाचा पारा वाढल्याने धरणांतील पाण्याची मागणी वाढल्यामुळे पाणीसाठा वेगाने कमी होण्यास सुरुवात झाली आहे.
Water storage in dams in Pune district begins to decrease
Water storage in dams in Pune district begins to decrease

पुणे : गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा पारा वाढल्याने धरणांतील पाण्याची मागणी वाढल्यामुळे पाणीसाठा वेगाने कमी होण्यास सुरुवात झाली आहे. सध्या पुणे जिल्ह्यातील २६ धरणांत १३१.८७ टीएमसी एवढा पाणीसाठा उपलब्ध आहे. पाण्याचे योग्य नियोजन जलसंपदा विभागाला जूनपर्यंत करावे लागणार आहे.  फेब्रुवारीपासून उन्हाचा चटका वाढू लागल्याने धरणांतील पाण्याची मागणी वाढण्यास सुरुवात झाली. धरणांतील उपलब्ध असलेल्या पाणीपातळी झपाट्याने कमी होऊ लागली आहे. आतापर्यंत सुमारे ५५ टीएमसी पाणीसाठ्याचा वापर झाला आहे. गेल्या महिन्यात १६ फेब्रुवारीपर्यंत धरणांत १६२.७४ टीएमसी पाणीसाठा उपलब्ध होता. नोव्हेंबर ते १५ फेब्रुवारीपर्यंत जवळपास २५ टीएमसी, तर १५ फेब्रुवारीनंतर ते आत्तापर्यंतच्या एका महिन्यात तब्बल ३० टीएमसीपर्यंत पाण्याचा वापर झाला आहे. सध्या उन्हाचा पारा ४० पर्यंत पोहोचला असला तरी धरणांतील मुबलक असलेली पाण्याची स्थिती पाहता येत्या काळात पाणीटंचाई कमी भासण्याची शक्यता आहे.  पुणे जिल्ह्यातील जवळपास सर्वच धरणे भरल्याने मोठ्या प्रमाणात उपयुक्त पाणीसाठा झाला होता. यामध्ये उजनी धरणाचाही समावेश आहे. गेल्या फेब्रुवारीच्या अखेरीपासून उन्हाचा पारा हळूहळू वाढू लागल्याने पाण्याची गरज अधिक प्रमाणात गरज भासू लागली. उजनी धरण वगळता उर्वरित सर्वच धरणे पुणे जिल्ह्याच्या पश्‍चिम भागात आहे. त्यातच पुणे व पिंपरी शहराची वाढती लोकसंख्या विचारात घेतली असता या दोन्ही शहरांना खडकवासला, चासकमान, पवना या धरणांतून पाणीपुरवठा होतो.  पूर्वेकडील पुरंदर, दौंड, बारामती, इंदापूर, खेड, शिरूर, जुन्नर आणि आंबेगाव या पूर्व भागातील तालुक्यांना पश्‍चिमेकडील धरणातून शेतीसाठी पाण्याचा विसर्ग सोडला जातो.  सध्या पिंपळगाव जोगे, डिंभे, घोड, चासकमान, वीर या धरणांतून पाण्याचा डाव्या कालव्यांना, तर डिंभे, घोड, खडकवासला, वीर धरणांतून उजव्या कालव्यांना पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे. याचा वापर शेतीसाठी केला जात आहे. याशिवाय खडकवासला धरणातून बंद जलवाहिनीद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. त्यामुळे धरणातील पाणीपातळी वेगाने कमी होत आहे. धरणातील पाणीसाठा वेगाने कमी होत असला तरी येत्या काळात पाण्याची मागणी आणखी वाढणार असल्यामुळे धरणांतील पाणीपातळी वेगाने कमी होण्याची शक्यता आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com