
पुणे ः कोरोनाच्या प्रादुर्भावापासून गावमुक्तीसाठी सरपंचासह ग्रामस्थांना प्रोत्साहन आणि आत्मविश्वास निर्माण व्हावा म्हणून ग्रामविकास विभागाच्या वतीने कोरोनामुक्त गाव स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी प्रथम द्वितीय, तृतीय क्रमांकासाठी अनुक्रमे ५०, १५, आणि १० लाखांचे बक्षिस गावाला मिळणार आहे, अशी माहिती पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली.
कोरोनाचा फैलाव राज्यात सुरू झाल्यानंतर प्रत्येकांना वैयक्तिक पातळीसह सामूहिक खबरदारी आणि उपाययोजनांसाठी शासनाने प्रयत्न केले. यामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी अभियान’ राबविले. आपल्या कुटुंबाबरोबर गावपातळीवर वाडी, वस्ती कोरोनामुक्त ठेवले तर तालुका, जिल्हा आणि राज्य कोरोनामुक्त होण्यास वेळ लागणार नाही. त्यामुळे गावे कोरोनामुक्त होणे आवश्यक आहे. त्यासाठी गावांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने राज्य सरकारने ही स्पर्धा सुरू केली आहे.
गाव कोरोनामुक्त ठेवण्यासाठी विविध संकल्पना उपाययोजना स्थानिक पातळीवर राबविण्यासाठी आणि त्यांच्या प्रयत्नांमध्ये गावा-गावात स्पर्धा निर्माण होऊन, गावे कोरोनामुक्त व्हावीत, यासाठी ग्रामस्थांचा उत्साह आणि प्रोत्साहन मिळावे यासाठी आर्थिक पाठबळ बक्षिस रुपी देण्यात येणार आहे. स्पर्धेमध्ये प्रामुख्याने कुटुंबनिहाय सर्वेक्षण, गावात विलगीकरण कक्ष स्थापन करणे, कोरोना तपासणीसाठी आणि उपचारासाठी गावातच रुग्णवाहिका उपलब्ध करून देणे, लसीकरण पथक स्थापन करावे लागणार आहे.
४४ गावांनी कोरोनाला रोखले पुणे जिल्ह्यातील ४४ गावांनी राज्यात कोरोनाचा पहिला रुग्ण सापडल्यापासून आतापर्यंतच्या सुमारे पावणे दोन वर्षांच्या कालावधीत कोरोना विषाणूला वेशीवरच रोखून धरले आहे. या सर्व गावांमध्ये आतापर्यंत एकाही रुग्णाची नोंद नाही.
स्पर्धेत सहभागासाठीच्या अटी
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.