
Bacchu Kadu Cabinet Minister : राज्यातील सत्ता संघर्षावर सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिल्यानंतर शिंदे-फडणवीस सरकारच्या दुसऱ्या मंत्रिमंडळ विस्ताराकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. भाजप आणि शिंदे गटातील आमदारांमध्ये रस्सीखेच सुरू असताना माजी मंत्री आमदार बच्चू कडू यांची नाराजी दूर करण्यासाठी त्यांना मंत्रीपदाचा दर्जा देण्यात आला आहे.
आमदार बच्चू कडू यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यामध्ये जून महिन्यात दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांग दारी अभियान राबवण्यात येणार आहे.
ठाकरे सरकारमध्ये मंत्री असलेले बच्चू कडू यांना शिंदे-फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने ते वारंवार नाराजी व्यक्त करीत होते. त्यांच्या वक्तव्याने शिंदे सरकारची कोंडी होत होती. त्यांची नाराजी दूर करण्यासाठी काही महिन्यांपूर्वी दिव्यांगांसाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन करण्यात आले होते.
सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिल्यानंतर शिंदे गटातील आमदार मंत्रिमंडळ विस्ताराच्या तारखा जाहीर करू लागले. दरम्यान, मंगळवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक पत्रक काढून राज्यात जून महिन्यात दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगाच्या दारी हे आभियान राबवले जाणार असल्याचे जाहीर केले. त्यासाठी एक समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीच्या अध्यक्षपदी बच्चू कडू यांची निवड करण्यात आली आहे. तसेच त्यांना मंत्रीपदाचा दर्जा देण्यात आला आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.