अमरावती जिल्ह्यातील ४८२ गावांत आपत्ती निवारण दल स्थापन

अमरावती ः जिल्ह्यात पूरप्रवण आणि अतिजोखमीची म्हणून ४८२ गावे निश्चि‍त करण्यात आली आहेत. या गावांमध्ये आपत्ती निवारण दल स्थापन करण्यात आले असून, या दलास आपत्ती निवारणासाठी आवश्‍यक प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

अमरावती  ः जिल्ह्यात पूरप्रवण आणि अतिजोखमीची म्हणून ४८२ गावे निश्चि‍त करण्यात आली आहेत. या गावांमध्ये आपत्ती निवारण दल स्थापन करण्यात आले असून, या दलास आपत्ती निवारणासाठी आवश्‍यक प्रशिक्षण देण्यात येणार आहे. 

केंद्र सरकारने २००५ मध्ये आपत्ती व्यवस्थापन कायदा पारित केला. त्यामुळे मॉन्सूनच्या कालावधीत आपत्ती निवारण यंत्रणा सज्ज करण्याला कायदेशीर महत्त्व प्राप्त झाले आहे. त्याअंतर्गत पुरात अडकलेल्या व्यक्‍तीस सुरक्षित बाहेर कसे काढावे, साहित्याचा वापर कसा करावा, यासह प्रथमोपचाराबाबतची माहिती व त्या अनुषंगाने इतरही काही बाबी शिकविण्यात येणार आहेत. या गावांमध्ये तालुकास्तरावर लाइफ जॅकेट, लाइफ बोटी, सर्च लाइट, मेगाफोन व दोरी आदी साहित्य वितरित करण्यात आले आहे.

आपत्ती नियंत्रणासाठी जिल्ह्यातील चौदाही तालुक्‍यात आपत्ती व्यवस्थापनाची जबाबदारी विविध अधिकाऱ्यांवर सोपविण्यात आली आहे. यामध्ये तहसीलदार, गटविकास अधिकारी, नगरपालिकेचे मुख्याधिकारी पोलिस निरीक्षक, तालुका कृषी अधिकारी, तालुका पशुसंवर्धन अधिकारी, पाटबंधारे विभागाचे अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी, महावितरण व आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

तालुकानिहाय पूरप्रवण गावे ः अमरावती ः ६२, अंजनगावसूर्जी ः ५६, अचलपूर ः ५५, वरुड ः ५१, तिवसा ः ४८, दर्यापूर ः ४८, मोर्शी ः ३८, भातकुली ः ३५, धामणगाव रेल्वे ः २७, चांदूरबाजार ः २६, नांदगाव खंडेश्‍वर ः २४, धारणी ः ७, चांदूर रेल्वे ः ६.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com