शेतकरी म्हणताहेत ‘कुणी खत देता का खत’

कंपनीकडून खत पुरवठा सुरळीत झालेला नसल्याने रत्नागिरी जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर ‘कुणी खत देता का खत’ असे म्हणत फिरण्याची वेळ आली आहे. खरीप हंगाम तोंडावर आला असतानाच जिल्ह्यात अवघे ३५० टन खत उपलब्ध झाले आहे.
Fertilizer
FertilizerAgrowon

रत्नागिरी ः कंपनीकडून खत पुरवठा सुरळीत झालेला नसल्याने रत्नागिरी जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर ‘कुणी खत देता का खत’ असे म्हणत फिरण्याची वेळ आली आहे. खरीप हंगाम तोंडावर आला असतानाच जिल्ह्यात अवघे ३५० टन खत उपलब्ध झाले आहे. कृषी विभागानेही अखेर संबंधित कंपनीला ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावली आहे. रत्नागिरी जिल्ह्याला पुरेसा खत पुरवठा झालेला नाही.

Fertilizer
गांडूळ खत, व्हर्मिवॉश निर्मिती तंत्र

दरवर्षी एप्रिलच्या अखेरीस खताचे नियोजन केले जाते. यंदा रशिया-युक्रेन युद्धाच्या परिणामस्वरूप खताची टंचाई निर्माण होऊ नये, यासाठी प्रशासन सज्ज झाले होते. शेतकऱ्यांकडून खताची मागणीही केली जात आहे. जिल्ह्याला १४ हजार टन खत लागणार असल्याचे कंपन्यांना कळविण्यात आले आहे.

वेळेत खत आलेले नसल्याने शेतकऱ्यांची गैरसोय होत आहे. खत कंपन्यांच्या सावळागोंधळाचा शेतकऱ्यांना फटका बसत आहे. या प्रकाराची जिल्ह्यातील मंत्र्यांनी दखल घ्यावी, अशी मागणी होत आहे.

सध्या पुरेसे खत उपलब्ध नाही; परंतु पुढील आठवड्यात रेल्वेने खत आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत, असे कृषी विकास अधिकारी अजय शेंडे यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com