
मुंबई : राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये या महिन्यात गारपीट व पूर्वमोसमी पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीचे पंचनामे करून तसे अहवाल शासनास पाठविण्याचे निर्देश सर्व विभागीय आयुक्त व सर्व जिल्हाधिकाऱ्यांना बुधवारी (ता.२२) जारी करण्यात आले.
या आपत्तीत पिकांच्या झालेल्या नुकसानीचे संयुक्त पंचनामे करावेत. ३३ टक्के किंवा त्यापेक्षा अधिक नुकसान झालेल्या बाधित शेतकऱ्यांना शासन निर्णयानुसार योग्य ती मदत मिळावी, यासाठी सविस्तर अहवाल अ, ब, क, ड या नमुन्यांमध्ये कृषी आयुक्तांमार्फत शासनाला पाठवावा.
फेब्रुवारी व मार्च महिन्यात अशाच प्रकारच्या गारपीट व पावसामुळे पिकांचे नुकसान झाले होते. त्याबाबत ज्या पिकांसाठी मदतीची मागणी केली आहे अथवा केली जाणार आहे, त्या पिकांचा समावेश अथवा मदतीची द्विरुक्ती यात होणार नाही, याची दक्षता घेण्याचे निर्देश या आदेशात देण्यात आले आहेत. राज्यातील शेतकऱ्यांना या आपत्ती काळात मदत व्हावी, यासाठी कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांनी हे आदेश जारी करण्यासाठी विशेष प्रयत्न केले आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.