
वृत्तसेवा - मध्य प्रदेश सरकारने मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान (CM Shivrajsingh Chauhan) यांच्या आदेशानंतर अलिकडेच अतिवृष्टी (Heavy Rain) आणि गारपिटीमुळे (Hailstrom) झालेल्या पिकांच्या नुकासानीचे (Crop Damage) पंचनामे १८ जानेवारीपर्यंत पूर्ण करण्याचा निर्णय घेतला आहे. पिकांचे ५० टक्क्यांपर्यंत नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना प्रति हेक्टर ३० हजार रुपये दिले जाणार आहेत, असे चौहान यांनी जाहीर केले आहे.
हेही वाचा - गहू तांदूळ, कारळासह ओट्सच्या नव्या जाती विकसित
राज्य सरकारच्या अधिकृत निवेदनानुसार, नुकसानग्रस्त जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांना (Collector) सर्वेक्षण करण्यास सांगण्यात आले आहे. सर्वेक्षणानंतर ही मदत वितरित केली जाणार आहे. गेल्या दोन दिवसांत मुख्यमंत्री चौहान यांनी अशोकनगर, विदिशा, निवारी आणि राजगड येथील बाधित गावांना भेट देऊन नुकसानीची पाहणी केली आहे.
हेही वाचा - पाच जिल्ह्यांत १४ लाख हेक्टरवर रब्बीची पिके
ज्या शेतकऱ्यांच्या पिकाचे ५० टक्के नुकसान झाले असेल, अशा शेतकऱ्यांना प्रति हेक्टर ३० हजार रुपयांचा मोबदला दिला जाणार आहे. याशिवाय गायी (Cow) आणि म्हशींच्या (Buffalo) मृत्यूसाठी राज्य सरकार शेतकऱ्यांना ३० हजार रुपयांची नुकसान भरपाईही दिली जाणार आहे. तर वासरे, शेळ्या आणि कोंबड्यांच्या नुकसानासाठीही काही प्रमाणात दिला देण्याचे नियोजन सरकार करत आहे.
दरम्यान, राज्य सरकारने बाधित जिल्ह्यांतील अल्प मुदतीच्या पीक कर्जांची (Crop Loan) वसुली पुढे ढकलण्यासाठी आणि त्यांचे मध्यम मुदतीच्या कर्जात रूपांतर करण्यासाठी केंद्र सरकारशी संपर्क साधण्याचा निर्णय घेतला आहे. मध्य प्रदेशात नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसामुळे रब्बी हंगामातील जवळपास ५० हजार हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.