कसे आहे केंद्र सरकारचे कृषीविषयक नियोजन ?

केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्र सिंग तोमर यांच्याहस्ते नुकतेच एका पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलं. 'इंडियन ऍग्रीकल्चर टूवर्ड्स २०३० : पाथवेज फॉर इन्हासिन्ग फार्मर्स इन्कम, न्यूट्रीशनल सेक्युरिटी अँड सस्टेनेबल फूड अँड फार्म सिस्टिम्स' असं या पुस्तकांचं नाव आहे. निती आयोग, केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण, पशु संवर्धन, दूधविकास, मत्स्य व्यवसाय या विभागातर्फे २०३० पर्यंत कृषी क्षेत्राच नियोजन यात सादर केले आहे.
Narendra Singh Tomar releases book titled Indian Agriculture towards 2030
Narendra Singh Tomar releases book titled Indian Agriculture towards 2030

केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्र सिंह तोमर (Narendra Singh Tomar)यांच्या हस्ते नुकतेच एका पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलं. 'इंडियन ऍग्रीकल्चर टूवर्ड्स २०३० : पाथवेज फॉर इन्हासिन्ग फार्मर्स इन्कम, न्यूट्रीशनल सेक्युरिटी अँड सस्टेनेबल फूड अँड फार्म सिस्टिम्स' असं या पुस्तकांचं नाव आहे.

निती आयोग आणि संयुक्त राष्ट्रसंघाच्या फूड अँड ॲग्रीकल्चर ऑर्गनायजेशनतर्फे (Food and Agriculture Organisation) आयोजित सोहळ्यात तोमर यांचा हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले आहे. नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत, सदस्य रमेश चंद यावेळी हजर होते.

निती आयोग, केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालय , पशु संवर्धन, दूधविकास आणि मत्स्य व्यवसाय मंत्रालयातर्फे २०३० सालापर्यंत देशाच्या कृषी क्षेत्राची वाटचाल कशी असावी ? याबाबतचे एक नियोजन या पुस्तकात घेण्यात आले आहे.

संयुक्त राष्ट्रसंघाच्या फूड अँड ॲग्रीकल्चर ऑर्गनायजेशनच्या आग्रहानुसार निती आयोग, केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालय, पशुसंवर्धन, मत्स्यव्यवसाय, दुग्धविकास आदी विभागांकडून २०१९ सालापासून करण्यात आलेल्या चर्चांनंतर २०३० सालापर्यंत भारतीय शेतीची दिशा कशी असावी, याबाबतचा हा दस्ताऐवज म्हणजेच हे पुस्तक असल्याचं सांगण्यात आलं आहे.

विविध विभागाच्या प्रतिनिधींसह कृषी क्षेत्रातील अभ्यासक, कृषी मालाच्या साखळीतील सहभागी घटकांनाही या चर्चांमध्ये सहभागी करून घेण्यात आले आहे. भारतीय कृषी क्षेत्रातील परिवर्तन, रचनात्मक सुधारणा आणि प्रशासन, खाद्य व पोषक घटकांची सुरक्षा, कृषी क्षेत्रासमोरील हवामान बदलाचे आव्हान, त्याला सामोरे जाण्यासाठी करावयाच्या उपाययोजना, विज्ञान, तंत्रज्ञान आणि नावीन्य, रसायने,खते पाणी व्यवस्थापन, जैविक खतांचा वापर आदी अनेक विषयांवर या पुस्तकात उहापोह करण्यात आला आहे. संयुक्त राष्ट्रसंघाच्या फूड अँड ॲग्रीकल्चर ऑर्गनायजेशनचे भारतातील प्रतिनिधी तोमियो शिचरी यांनी या पुस्तकाला प्रस्तावना लिहिली आहे.

जानेवारी महिन्यात भारतीय कृषी क्षेत्राची २०३० पर्यंतच्या वाटचालीवर जानेवारी महिन्यात एक राष्ट्रीय परिसंवादही आयोजित करण्यात आला होता. ज्यात येत्या काळातील कृषी विकासासाठी राबवायचे उपाय, पोषक घटकांचा खाद्य सुरक्षेत समावेश आणि शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ अशा मुद्यांवर चर्चा करण्यात आली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com