Farmer Suicide : शेतकऱ्यांचा आत्महत्या रोखण्यासाठी मास्टर प्लॅन, मराठवाडा विभागीय आयुक्तांचा सरकारकडे प्रस्ताव

Suicide In Marathwada : मराठवाडा आणि विदर्भामधील शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी मराठवाड्याचे विभागीय आयुक्त आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी एक प्रस्ताव राज्य शासनाकडे सादर केला आहे.
sunil kendrekar
sunil kendrekaragrowon

Farmers Committed Suicide : कधी कोरडा तर कधी ओला दुष्काळ यामुळे शेतकऱ्याचे मोठा नुकसान होते. निसर्गाचे संकट, नापिकी, बाजारभाव आणि कर्जबाजारीपण या चक्रातून बाहेर पडण्यासाठी अनेक शेतकरी टोकाचे पाऊल उचलत जीवन संपवत आहे. शेतकरी आत्महत्या (Farmer Suicide) थांबवण्यासाठी ठोस पाऊले उचलणार असल्याचा दावा राज्यकर्ते करतात. पण दरवर्षी आत्महत्या ग्रस्त शेतकऱ्यांच्या संख्येत वाढच होत असते.

दरम्यान, शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी औरंगाबाद विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी एक सर्व्हे करून प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. ज्यामध्ये शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी शेतकऱ्यांना खरीप आणि रब्बी हंगामाच्या पेरणीसाठी प्रती एकर 10 हजार रुपये रोख रक्कम देण्याशी शिफारस करण्यात आली आहे. याबाबतचा अहवाल राज्य सरकारला देण्यात आला आहे.

sunil kendrekar
Farmer Suicide : उपाययोजनानंतरही वाढल्या शेतकरी आत्महत्या

औरंगाबाद विभागाचे विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी मराठवाड्यातील आठही जिल्ह्यात एक सर्व्हे केला आहे. ज्यात पाच लाख कुटुंबाचे 12 टप्प्यात आणि 100 प्रश्न तयार करुन हा सर्व्हे करण्यात आला आहे. सर्व्हे करताना प्रश्नांचे एकूण बारा विभाग करण्यात आले. यात एकूण 104 प्रश्नांची माहिती अधिकाऱ्यांमार्फत भरुन घेण्यात आली. यात आत्महत्या करण्याच्या विचारत असलेल्या शेतकऱ्यांची वेगळी यादी तयार करण्यात आली.

sunil kendrekar
Farmer Suicide : कर्जबाजारी, नापिकीला कंटाळून १८१ शेतकऱ्यांच्या आत्महत्या

याबाबत बोलताना सुनील केंद्रेकर म्हणाले की, सध्या शेतकऱ्यांची परिस्थिती खूप वाईट आहे. त्यामुळे त्यांना दिलासा देण्यासाठी आणि शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी आम्ही एक सर्व्हे केला. ज्यात आमच्या जिल्हाधिकारी यांनी देखील स्वतः शेतकऱ्यांच्या घरी जाऊन माहिती जमा केली. त्यामध्ये असे निदर्शनास आले की, शेतकरी आत्महत्या करण्याचं महत्वाचा कारण आर्थिक परिस्थितीच आहे. त्यावर ठोस निर्णय घेणे गरजेचे आहे

जे शेतकरी आत्महत्या करण्याच्या विचारत आहेत. अशा शेतकऱ्यांना संवाद साधून त्यांची अडचणी समजून घेतल्या जात आहे. तसेच त्यांचे समुपदेशन करण्यात येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना खरीप आणि रब्बी हंगामातील पेरणीच्या वेळी 10 हजार रुपये प्रती एकर दिल्यास आत्महत्या रोखण्यात यश येऊ शकते असे केंद्रेकर म्हणाले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com