उत्तर भारतात मोहरी,हरभऱ्याला अवकाळीचा फटका

जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात पडलेल्या अवकाळी पावसाने काही पिकांच्या वाढीला फायदा झाला असला तरीही काही पिकांचे वेळापत्रक बिघडले आहे.विशेषतः या अवकाळी पावसाने व वादळी वाऱ्याचा फटका राजस्थानमधील मोहरी आणि हरभऱ्याला बसला आहे.
Hailstorm.jpg
Hailstorm.jpg

अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे उत्तर भारतातील रब्बी हंगामातील मोहरी, हरभरा, गहू, बटाटे यांसारख्या पिकांचे नुकसान झाले आहे. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात बाजारात दाखल होणाऱ्या या पिकांचे बाजारातील आगमन आता तीन आठवड्यांनी लांबणीवर पडले आहे. शेतात पाणी साठल्यामुळे काढणीचा हंगाम पुढे ढकलला गेला आहे.    

मोहरीचे नवे पीक बाजारात येण्यास विलंब झाल्याचा फटका म्हणून गेल्या आठवड्यात मोहरीच्या तेलाचे दर लिटरमागे ५ रुपयांनी वाढल्याचे पहावयास मिळाले आहे.  

जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात पडलेल्या अवकाळी पावसाने काही पिकांच्या वाढीला फायदा झाला असला तरीही काही पिकांचे वेळापत्रक बिघडले आहे. विशेषतः या अवकाळी पावसाने व वादळी वाऱ्याचा फटका राजस्थानमधील मोहरी आणि हरभऱ्याला बसला आहे. अवकाळी पावसाने भरतपूर, ढोलपूर आणि कोटा परिसरातील हाताशी आलेल्या पिकांचे मोठे नुकसान झाल्याचे क्रिसिल रिसर्चचे संचालक हेतल गांधी यांनी म्हटले आहे. 

खरेतर या काळात पडणारा पाऊस हरभरा अथवा मोहरीच्या वाढीसाठी अनुकूल मानल्या जातो. मात्र अवकाळी पावसाचे अवास्तव प्रमाण लक्षात घेता या दोन्ही पिकांचे मोठे नुकसान झाल्याचे पहायला मिळाले आहे. यंदा ९० लाख हेक्टर क्षेत्रात मोहरीची लागवड करण्यात आली आहे. गेल्यावर्षी ७२.५ लाख हेक्टर क्षेत्रात मोहरीची लागवड करण्यात आली होती.   

यावर्षी आम्हाला १०९ लाख टन उत्पादनाची अपेक्षा असल्याचा अंदाज सॉल्व्हंट एक्ट्राक्टर्स असोसिएशन ऑफ इंडियाचे कार्यकारी संचालक बी.व्ही.मेहता यांनी वर्तवला आहे. पूर्व आणि पश्चिम उत्तर प्रदेश आणि पंजाबमधील गव्हालाही या अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. काढणीसाठी तयार होत असलेल्या गव्हातील मॉईश्चरचे  प्रमाण वाढण्याची शक्यता आहे, मात्र या अवकाळीमुळे एकूण या पिकाचे फारसे नुकसान झाले नसल्याचे गांधी म्हणाले आहेत. 

अवकाळीचा खरा फटका उत्तर प्रदेश, राजस्थान आणि पंजाबमधील बटाट्याला बसला आहे. राजस्थान आणि उत्तर प्रदेशातील पिकाला करप्याची लागण झाल्याचे दिसून आले आहे. पंजाबमध्येही बटाट्याचे १० ते १५ टक्क्यांचे नुकसान दिसून आले आहे.  

मोहरीच्या बियांचा दर सध्या प्रति क्विंटल ८२०० रुपये असून अवकाळीचा फटका बसल्याचे काही परिणाम तेलबिया अथवा तेलाच्या किमतीवर दिसून येणार नाही. बाजारात यापूर्वीच मोठ्या प्रमाणात मोहरीचे उत्पादन दाखल झाल्याचेही मेहता यांनी नमूद केले आहे. फेब्रुवारी महिन्यात मोहरीला प्रति क्विंटल ६६०० असा दर राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com