Farmer Incentive Subsidy : ‘प्रोत्साहनपर’च्या दुसऱ्या यादीतील लाभार्थ्यांचे आधार प्रमाणीकरण बाकी

राज्य शासनाने महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना २०१९ अंतर्गत प्रोत्साहनपर लाभ योजनेबाबत २९ जुलै २०२२ रोजी शासन निर्णय निर्गमित केलेला आहे.
Mahatma Jyotirao Phule Farmers Debt Relief Scheme
Mahatma Jyotirao Phule Farmers Debt Relief Scheme Agrowon

Aurangabad Farmer Loane Waive Scheme : महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना (Mahatma Jotirao Phule Farmer Loan Waive Scheme) २०१९ अंतर्गत प्रोत्साहनपर लाभ योजने अंतर्गत (Farmer Incentive Subsidy) दुसऱ्या यादीतील १६९९ लाभार्थ्यांचे आधार प्रमाणीकरण अजूनही बाकी आहे.

राज्य शासनाने महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना (Karjmukti Scheme) २०१९ अंतर्गत प्रोत्साहनपर लाभ योजनेबाबत २९ जुलै २०२२ रोजी शासन निर्णय निर्गमित केलेला आहे.

त्यानुसार २०१७-१८, २०१८-१९ व सन २०१९-२० या आर्थिक वर्षात घेतलेल्या कर्जापैकी दोन वर्षाच्या कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. या योजनेत जास्तीत जास्त ५० हजार रुपये पर्यत पात्र लाभार्थींना लाभ मिळणा़र आहे.

या तीन वर्षापैकी शेवटच्या वर्षात जे कर्ज घेतलेले आहे. त्या वर्षाच्या कर्जाची मुद्दल रक्कम विचारात घेतली जाणार आहे.

औरंगाबाद जिल्ह्यामध्ये या योजनेअंतर्गत जिल्ह्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, सर्व राष्ट्रीयकृत व खासगी बँका यांनी या योजनेत पात्र असलेल्या खातेदारांची माहिती ऑनलाइन पोर्टलवर भरलेली आहे.

Mahatma Jyotirao Phule Farmers Debt Relief Scheme
Farmer Loan Waive : ‘कर्जमुक्ती’च्या यादीत १२ हजार ९४२ शेतकरी

योजनेत पात्र असलेल्या शेतकऱ्यांची विशिष्ट क्रमांकासह (व्ही-के लिस्ट) प्रसिद्ध झालेल्या २४ डिसेंबर २०२२ रोजीच्या दुसऱ्या यादीतील १६९९ शेतकऱ्यांनी त्यांचे आधार प्रमाणिकरण अद्यापपूर्ण केलेले नाही.

प्रमाणीकरणानंतर पात्र लाभार्थ्यांची प्रोत्साहनपर लाभाची रक्कम त्यांच्या बँकेच्या सेव्हिंग खात्यावर जमा होणार आहे.

Mahatma Jyotirao Phule Farmers Debt Relief Scheme
Farmer Incentive Scheme : ‘प्रोत्साहन’पासून निम्मे शेतकरी वंचित

तरी विशिष्ट क्रमांकासह यादी प्रसिद्ध झालेल्या यादीतील ज्या शेतकऱ्यांनी अद्याप त्यांचे आधार प्रमाणिकरण पूर्ण केलेले नाही अशा शेतकऱ्यांनी संबंधित बँकेत, सीएससि व आपले सरकार सेवा केंद्रावर मुळ आधारकार्ड व बचत खात्याचे पासबुक घेऊन जाऊन आधार प्रमाणिकरण करून घ्यावे.

शेतकऱ्याने आधार प्रमाणीकरणासाठी गेल्यानंतर त्यांचा आधार क्रमांक किंवा त्यांच्या कर्जाची रक्कम चुकली असेल, तर त्याबाबत त्या शेतकऱ्याने तशी तक्रार संबंधित पोर्टलवर नोंदवावी.

अशा प्राप्त होणाऱ्या तक्रारीचे निवारण करण्यासाठी जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी समिती यांच्या तर तालुका स्तरावर संबंधित तालुक्याचे तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्त करण्यात आली आहे.

शेतकऱ्यांनी सदर योजनेच्या लाभासाठी संबंधित बँकेत किंवा सेवा केंद्रामध्ये तातडीने जाऊन आधार प्रमाणिकरण करून घेण्याचे आवाहन, जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, औरंगाबाद यांनी केले आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com