
बारामती ः शहरातील पिण्याच्या पाण्याच्या जुन्या वाहिन्या (Water Line) बदलून नवीन वाहिन्या टाकण्याच्या कामाला पुन्हा प्रारंभ झाला आहे. गळती (Water Leakage) कमी करून पुरेशा दाबाने नागरिकांच्या घरात पाणी देण्याच्या बृहतबारामती पाणीपुरवठा योजनेच्या (Water Supply Scheme) दुसऱ्या टप्प्यामध्ये दोन साठवण तलाव, एक जलशुध्दीकरण केंद्र व ३५० कि.मी. लांबीच्या वाहिन्या बदलण्याच्या कामाचा समावेश आहे.
काही वर्षांपूर्वी टाकलेल्या पिण्याच्या पाण्याच्या वाहिन्यांची अवस्था खराब झाल्याने तो बदलण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या साठी महत्वाकांक्षी बृहत बारामती पाणीपुरवठा योजना हाती घेण्यात आली. या मध्ये एचडीपीई (हाय डेन्सिटी पॉलिथिलिन) पाईपचा वापर करण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अभियंता प्रकाश जगताप यांनी दिली.
या कामापैकी पहिल्या टप्प्यातील जवळपास साठ कि.मी. पाईपलाईन टाकण्याचे काम पूर्णत्वास गेले आहे. उर्वरित काम टप्याटप्याने पूर्ण करण्यात येणार आहे. या अंतर्गत तांदुळवाडी व जळोची येथे अनुक्रमे २०० व १७५ दशलक्ष लिटर्स साठवण क्षमतेचे दोन तलाव उभारले जाणार आहेत.
या शिवाय सध्याच्या बारामती नगरपालिकेच्या जुन्या जलशुध्दीकरण केंद्राच्या जागी नवीन जलशुध्दीकरण केंद्राची उभारणी केली जाणार आहे. या कामाचे वेळापत्रक निश्चित करण्यात आले.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.