
कडेगाव, जि. सांगली ः ‘‘दुष्काळी भागाला (Drought Area) वरदान ठरलेली ताकारी उपसा सिंचन योजना (Takari Irrigation Scheme) पूर्णत्वाच्या अंतिम टप्प्यात आहे. या योजनेच्या पाचव्या सुधारित प्रशासकीय अहवालास शासन मान्यता मिळाल्याने निधीचा मार्ग मोकळा झाला आहे. सध्या १६ हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आहे.
येत्या दोन वर्षांत उर्वरित अपूर्ण कामे पूर्ण व्हावी आणि संपूर्ण २७ हजार ४३० हेक्टर क्षेत्र ओलिताखाली यावे, या साठी मी शासनस्तरावर पाठपुरावा करीत आहे,’’ अशी माहिती आमदार डॉ. विश्वजित कदम यांनी दिली. कदम म्हणाले, ‘‘माजी मंत्री व आमदार डॉ. पतंगराव कदम हे १९८५ ला आमदार झाले. तेव्हापासून ताकारी योजनेला निधी देण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहिले.
सुरुवातीची ताकारी योजना ८० कोटींची योजना होती. यानंतर खर्च वाढत गेला. आता ताकारी म्हैसाळ योजनेचा ८ हजार २७२ कोटी इतक्या खर्चाचा पाचवा सुधारित प्रशासकीय अहवाल मंत्रिमंडळ बैठकीत मंजूर झाला आणि त्याचा नुकताच अध्यादेशही निघाला आहे. यात योजनेसाठीचा १३२२ कोटींचा सुधारित प्रशासकीय अहवाल समाविष्ठ आहे.
खर्च झालेला ९५० कोटींचा निधी वजा जाता आता जवळपास ३७२ कोटी रुपयांची तरतूद झाली आहे. या योजनेसाठी आजवर ९५० कोटी इतका निधी खर्च झाला आहे. पूर्णत्वासाठी ३७२ कोटींची गरज आहे.
यापैकी या वर्षी तातडीने १५० कोटी रुपयांचा निधी मिळावा व कामे तत्काळ मार्गी लागावी, यासाठी मी प्रयत्नशील आहे.’’ ‘‘वितरिकांचे अस्तरीकरण आणि बंदिस्त पाइपलाइनसाठी २०५ कोटी ५१ लाख इतका अंदाजित खर्च होईल,’’ असे डॉ. कदम यांनी सांगितले.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.