
यवतमाळ : नुकसानग्रस्त चार लाख शेतकऱ्यांपैकी एक लाख शेतकऱ्यांच्या पीकविमा (Crop Insurance) खात्यात जमा झाला आहे. पीकविम्याची रक्कम (Crop Insurance Compensation) शेतकऱ्यांच्या खात्यात जमा व्हायला सुरुवात झाली आहे. उशिरा का होईना पीकविमा मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान दिसून येत आहे.
पीकविम्याचा हप्ता भरल्यानंतरही शेतकऱ्यांना भरपाई मिळत नाही, असा काही वर्षातील अनुभव आहे. त्यामुळेच गेल्या काही वर्षांत पीकविमा योजनेत सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या सातत्याने कमी होत आहे. यंदा जिल्ह्यात चार लाख पंधरा हजार शेतकऱ्यांनी पंतप्रधान पीकविमा योजनेत सहभाग नोंदविला आहे.
पीकविमा योजनेतील सहभागी शेतकऱ्यांची संख्या कमी असतानाच जिल्ह्यात पावसामुळे झालेल्या नुकसानीपोटी भरपाई मिळावी, याकरिता पूर्वसूचना देणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या त्यापेक्षाही कमी आहे. कृषी विभागाने चार लाख शेतकऱ्यांपैकी केवळ दोन लाख शेतकऱ्यांचे पंचनामे पूर्ण केलेले आहेत. त्यातील १ लाख ५ हजार शेतकऱ्यांना पीकविमा मंजूर केला आहे.
पीकविमा कंपनीने ८३ कोटी रुपये जिल्ह्यासाठी मंजूर केले आहेत. संबंधित कंपनीला कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा होत आहे. शेतकऱ्यांना पीकविमा मिळाला असला तरी अजूनही अनेक शेतकरी मदतीपासून वंचित आहेत.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.