
संग्रामपूर, जि. बुलडाणा ः यंदाच्या खरीप हंगामात (Kharif season) सततच्या पावसाने सर्वच शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान (Crop Damage) झाले आहे. पीकविमा (Crop Insurance) काढलेल्या बऱ्याच शेतकऱ्यांनी पूर्वसूचना दिल्याने त्यांचे सर्वेक्षण झाले. मात्र ज्यांनी विमा काढलेला आहे, पण सूचना दिलेली नसल्याने सर्वेक्षण झालेले नाही. अशा शेतकऱ्यांच्या भरपाईचे काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
तालुक्यात यंदाच्या हंगामात काही मंडलांत अतिवृष्टाचा तडाखा बसला होता. यात पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. पीकविमा काढलेल्यांपैकी काहींनी पूर्वसूचना दिल्याने त्यांच्या पिकांचे सर्वेक्षण झाले. ज्यांनी सूचना दिलेली नव्हती, अशांचे पंचनामे झालेले नाहीत.
वास्तविक अतिवृष्टीने पीकविमा काढलेले व न काढलेल्यांचे सारखेच नुकसान झाले. आता पीकविमा मिळण्याची शक्यता आहे. या भरपाईत सर्वांना मदत मिळणे गरजेचे आहे. कारण पूर्वसूचना न दिल्याच्या कारणाने मदत नाकारणे योग्य होणार नाही.
अनेकदा ग्रामीण भागात मोबाईल सुविधा मिळत नाही. कृषी सहायकांकडे अनेक गावांचा कारभार असल्याने हे कर्मचारी वेळेत भेटत नाहीत. अशा वेळी काही शेतकऱ्यांकडून पूर्वसूचना, अर्ज दिले गेलेले नाहीत. ही वस्तुस्थिती कृषी विभाग, विमा कंपनीलाही माहिती आहे. आता पीकविमा भरपाई देत असताना याही शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळणे गरजेचे आहे.
यंदा सलग पावसाने खरीप हंगामात सोयाबीन, कापूस पिकांचे अतोनात नुकसान झाले. काही शेतकऱ्यांना सोयाबीनचा एकरी दोन क्विंटलपासून उतारा आहे. कपाशीच्या पिकाचेही असेच नुकसान झाले होते. मॉन्सूनपूर्व पेरणी केलेल्या शेतकऱ्यांच्या शेतात सुरुवातीला लागलेल्या सर्वच बोंड्या कुजल्याचे प्रकार घडले होते. त्यामुळे शासनाने या शेतकऱ्यांचा सहानुभूतीने विचार करण्याची मागणी तालुक्यातील शेतकऱ्यांनी केली.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.