
खर्डी : प्रत्येक गोरगरिबाला स्वतःचे छप्पर मिळावे यासाठी शासन घरकुल योजनेची (Gharkul Scheme) अंमलबजावणी सर्वत्र करीत आहे.
परंतु शहापूर तालुक्यातील दहिगाव येथील दोन कुटुंबांनी आपले राहते घर पाडून त्याठिकाणी मंजूर घरकुलाअंतर्गत बांधकामाला सुरुवात केल्यानंतर ग्रामसेवकाने संबंधित कुटुंबांना तांत्रिक अडचणीचे कारण देत काम बंद केल्याने आदिवासी कुटुंबावर ऐन थंडीत (Cold Weather) उघड्यावर राहाण्याची वेळ आली आहे.
ऐन थंडीत घरकुल बांधकाम (Gharkul House Work) थांबवल्यामुळे आदिवासी कुटुंब मुलाबाळांसहित हवालदिल झाले आहे.
याबाबत लोकप्रतिनिधी मूग गिळून बसल्याने होणारा अन्याय दूर करून आमच्या हक्काचे छप्पर आम्हाला मिळवून द्यावे व आमच्या मुलाबाळांचे रक्षण करावे, अशी भावनिक साद घालत आहे.
पळशीन येथे गेल्या ५० वर्षांपासून गंगुबाई चौधरी व संजय चौधरी हे राहत आहेत. त्यांचे कारवीच्या काड्यांच्या पडक्या घरात वास्तव्य होते.
त्यांनी घरकुल मिळावे म्हणून अर्ज केल्यावर शासकीय यंत्रणेने सर्व्हे करून त्यांना नोव्हेंबर २०२२ मध्ये घरकुल मंजूर झाले.
घरकुल मंजूर झाल्याने ग्रामसेवकांनी त्यांना घर पाडून घरकुल बांधण्याची परवानगी दिली. त्यामुळे त्यांनी आपली झोपडी पाडून घरकुलाची पायाभरणीही केली.
त्यांना घरकुलाचा १५ हजार रुपयांचा एक हप्ताही मिळाला होता; परंतु अचानक ग्रामसेवकाने स्थानिक तक्रार आल्याचे सांगून घरकुलाचे काम बंद केले.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.