
ही योजना (Mango Crop Insurance) कोकण सोडून इतर भागांतील आंबा (Mango) पिकासाठी नगर, लातूर, उस्मानाबाद, परभणी, नांदेड, वाशीम, जालना, सोलापूर, धुळे, जळगाव, नंदुरबार, बुलडाणा, औरंगाबाद, बीड, नाशिक, पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा या १९ अधिसूचित जिल्हा, तालुक्यातील अधिसूचित महसूल मंडळात लागू आहे. या जिल्ह्यात शासनामार्फत अधिसूचित महसूल मंडळ पातळीवर असलेल्या शासकीय हवामान केंद्र आकडेवारीवरून नुकसानभरपाई (Crop Damage Compensation) अंतिम केली जाते.
या योजनेअंतर्गत पाच वर्षे वय झालेल्या आंबा पिकास निवडलेल्या विमा कंपनी मार्फत खाली नमूद केलेल्या विमा संरक्षण कालावधीत निवडक हवामान धोक्यामुळे होणाऱ्या संभाव्य पीक नुकसानीस (आर्थिक) खालील प्रमाणे विमा संरक्षण प्रदान होईल.
आंबा (समूह ब) समाविष्ट जिल्हे ः नगर, औरंगाबाद, लातूर, उस्मानाबाद, परभणी, नांदेड, बीड, वाशीम, जालना,
नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार, बुलडाणा
चौकट ः निवडक हवामान धोक्यामुळे होणाऱ्या संभाव्य पीक नुकसानीस विमा संरक्षण.
आंबा (समूह क) समाविष्ट जिल्हे ः पुणे, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, सातारा
कोकण सोडून इतर भागांतील आंबा पिकासाठी भाग घेण्याचा अंतिम दिनांक : ३१ डिसेंबर २०२२
शेतकऱ्यांसाठी विमा हप्ता ः
हवामान धोके---विमा संरक्षित रक्कम रुपये प्रति हेक्टर---शेतकऱ्यांसाठी विमा हप्ता रुपये प्रति हेक्टर
अवेळी पाऊस , कमी/ जास्त तापमान ---१४,००००----७,००० ते २३,८००
गारपीट---४६,६६७----२३३४
योजना कार्यान्वित करणारी यंत्रणा ः
जिल्हे--- विमा कंपनी
१) नगर, अमरावती, सिंधुदुर्ग, नाशिक, वाशीम, यवतमाळ, धुळे, पालघर, सोलापूर, रत्नागिरी, नागपूर, नंदुरबार ः रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी लि.
२) बीड, औरंगाबाद, अकोला, सांगली, वर्धा, ठाणे, हिंगोली, सातारा, परभणी, जालना, लातूर, कोल्हापूर ः एचडीएफसी एर्गो जनरल इन्शुरन्स कं. लि.
३) रायगड, बुलडाणा, जळगाव, नांदेड, पुणे, उस्मानाबाद ः भारतीय कृषी विमा कंपनी लिमिटेड, मुंबई
शेतकऱ्यांचा योजनेतील सहभाग ः
१) या योजनेत अधिसूचित क्षेत्रात, अधिसूचित फळपिकासाठी कुळाने, भाडेपट्टीने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसहित इतर सर्व शेतकरी भाग घेऊ शकतात.
२) पीककर्ज घेणाऱ्या आणि बिगर कर्जदारांसाठी योजनेतील सहभाग ऐच्छिक राहणार आहे.
३) बिगर कर्जदार शेतकरी विहित मुदतीत बँकेत विमा हप्ता जमा करून सहभाग घेऊ शकतात. त्यासाठी आधार कार्ड, जमीन धारणा ७ /१२ , ८(अ) उतारा व पीक लागवड स्वयंघोषणा पत्र, फळबागेचा जिओ टॅगिंग केलेला फोटो, बँक पासबुकवरील बँक खातेबाबत सविस्तर माहिती लागेल. कॉमन सर्व्हिस सेंटरमार्फत अर्ज ऑनलाइन भरता येतील.
४) एक शेतकरी त्याच्याकडे एकापेक्षा अधिक फळपिके असल्यास योजना लागू असलेल्या पिकांसाठी तो विमा योजनेत सहभाग घेऊ शकतो (मात्र त्या फळपिकासाठी ते महसूल मंडळ अधिसूचित असणे आवश्यक आहे.)
५) एक शेतकरी ४ हेक्टरच्या मर्यादेत विमा संरक्षण घेऊ शकतो.
६) शेतकऱ्यांसाठी विमा हप्ता, विमा संरक्षित रकमेच्या ५ टक्क्यांच्या मर्यादेत असतो. याहून अधिकचा हप्ता केंद्र व राज्य शासनाकडून अनुदान म्हणून म्हणून देण्यात येतो. मात्र विमा हप्ता ३५ टक्क्यांपेक्षा जास्त असल्यास शेतकऱ्याला ५ टक्क्यां पेक्षा जास्त विमा हप्ता भरावा लागतो.
७) या विमा योजनेअंतर्गत हवामान धोक्याच्या ट्रिगर कार्यान्वित झाल्यास त्या महसूल मंडळातील त्या पिकासाठी भाग घेतलेल्या शेतकऱ्यास नुकसानभरपाई रक्कम संबंधित विमा कंपनीकडून देण्यात येणार आहे.
संपर्क ः संबंधित विमा कंपनी किंवा संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालय.
(लेखक कृषी विभागामध्ये कृषी सहसंचालक (विस्तार व प्रशिक्षण) आहेत.)
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.