
Amravati Crop Insurance : काढणीपश्चात नैसर्गिक आपत्तीमुळे (Natural calamity) झालेल्या नुकसानीची भरपाई (Crop Damage Compensation) मिळण्यासाठी शेतकऱ्यांना विमा कंपनीने (Crop Insurance Company) झुलवत ठेवले आहे. जिल्ह्यातील १० हजार ५७६ शेतकऱ्यांना अद्यापही विमा परतावा मिळालेला नाही. १२ कोटी ८६ लाख रुपये परतावा मिळायचा आहे.
काढणी पश्चात नैसर्गिक आपत्तीमुळे शेतपिकांचे नुकसान झाल्यास भरपाईसाठी प्रधानमंत्री पीकविमा योजनेतून विमा संरक्षण दिल्या जाते. मात्र शेतकऱ्यांना ही नुकसानभरपाई मिळवण्यासाठी विमा कंपनीचे उंबरठे झिजवावे लागत आहेत.
काढणीपश्चात झालेल्या पावसामुळे शेतमालाचे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांनी त्यासाठी विमा संरक्षण घेत क्षेत्र विमा संरक्षित केले होते. त्यासाठी लागणारे हप्तेही नियमित भरले.
अमरावती जिल्ह्यातील वरूड वगळता तेरा तालुक्यातील १० हजार ५७६ शेतकऱ्यांचे काढणी पश्चात नुकसान झाल्याचा संयुक्त अहवाल आहे. त्यांना विमा परतावा मिळणे अपेक्षित होते.
मात्र शासनाने त्यांचा हप्ता भरला नाही, असा युक्तिवाद करीत विमा कंपनीने परतावे दिलेले नाहीत. तर, कृषी विभागाकडून परताव्यासाठी सातत्याने करण्यात येत असलेल्या पाठपुराव्यास कंपनीकडून प्रतिसाद मिळत नसल्याने कृषी विभागाने तंबी दिली आहे.
विमा परताव्याच्या प्रतीक्षेत शेतकरी असून त्यांच्यात विमा कंपनीबद्दल असंतोष निर्माण होऊ लागला आहे. भरपाईच मिळत नसेल तर संरक्षण तरी कशासाठी घ्यायचे असा सवाल त्यांनी केला आहे.
तालुकानिहाय स्थिती
तालुका - शेतकरी संख्या - परतावा रक्कम
अचलपूर १६१२ १ कोटी ८८ लाख
अमरावती ३९० ६६.५० लाख
अंजनगाव २१०९ १ कोटी ५९ लाख
भातकुली ४५८ ५४.५६ लाख
चांदूररेल्वे २३७ ४१.२३ लाख
चांदूरबाजार २७२२ ४ कोटी ३ लाख
चिखलदरा ३१८ २५.४४ लाख
दर्यापूर ३५३ ४०.६६लाख
धामणगाव ४७९ १ कोटी ८लाख
धारणी ६९४ ७१.५३ लाख
मोर्शी २१४ ४५.०४ लाख
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.