सरकारी धोरणामुळे साखर उद्योग क्षेत्राला दिलासा

यंदाच्या हंगामात साखरेसोबत इथेनॉल मिश्रणामुळेही कारखान्यांना लाभ होतोय. गेल्या हंगामातील इथेनॉलचा विक्रीतून कारखान्यांना चांगला महसूल मिळाला असल्याची प्रतिक्रिया एलकेपी सिक्युरिटीजचे संशोधन विभागाचे प्रमुख एस. रंगराजन यांनी व्यक्त केलीय.
sugar.jpg
sugar.jpg

केंद्र सरकारच्या अनुकूल धोरणामुळे साखर उद्योग क्षेत्राला दिलासा मिळाला आहे. गेल्या दोन आठवड्यांपासून साखर उदयोग क्षेत्रात सकारात्मक वातावरण आहे. इथेनॉल मिश्रणाच्या अभियानासाठी केंद्र सरकारकडून देण्यात येणारे प्रोत्साहन आणि पथ्थ्यावर पडणाऱ्या आयात धोरणामुळे या क्षेत्रात सध्या समाधानकारक अवस्था आहे. 

गेल्या दोन आठवड्यांपासून इआयडी पॅरी आणि त्रिवेणी इंजिनियरिंग या कंपन्या २० टक्के नफ्यात राहिल्या आहेत. तर दालमिया भारत शुगर १५ टक्के नफ्यात आहे.  द्वारिकेश शुगरला ३४ टक्के नफा, अवध शुगरला ३७ टक्के आणि उत्तम शुगरला २७ टक्के नफा झालाय. साखर उत्पादनात देशात तिसऱ्या स्थानी असलेल्या कर्नाटकातही इथेनॉल मिश्रणाच्या अभियानात सहभागी होण्याची तयारी केलीय.

यंदाच्या हंगामात साखरेसोबत इथेनॉल मिश्रणामुळेही कारखान्यांना लाभ होतोय. गेल्या हंगामातील इथेनॉलचा विक्रीतून कारखान्यांना चांगला महसूल मिळाला असल्याची प्रतिक्रिया एलकेपी सिक्युरिटीजचे संशोधन विभागाचे प्रमुख एस. रंगराजन यांनी व्यक्त केलीय.    

केंद्र सरकारच्या साखर उद्योग क्षेत्राला दिलासा देणाऱ्या या धोरणामुळे साखर कारखान्यांना आपल्या जमाखर्चाचा ताळमेळ बसवणे शक्य झाले आहे याखेरीज शेतकऱ्यांची थकबाकी वेळेवर जमा करणे शक्य झाले आहे.  २०२० च्या वित्तीय वाटचालीतही साखर उद्योगाला असाच दिलासा मिळत राहील, असा आशावाद  रंजराजन यांनी व्यक्त केलाय. 

चालू विपणन वर्षात (डिसेंबर ते नोव्हेंबर) तेल विपणन कंपन्यांनी ३६९ अब्ज लिटर इथेनॉल खरेदीचे करार केलेले आहेत. दरम्यान अंतर्गत आणि जागतिक  बाजारपेठेतील साखरेचे दरही स्थिर असून देशात डिसेंबर अखेरीस ११.६ दशलक्ष टन साखर उत्पादनाचा अंदाज आहे.    

सरकारकडून किमान आधारभूत मूल्य (MSP), बफर स्टॉक, उत्पादन साहाय्य आणि विपणन व वाहतूक योजनांतर्गत दिले जाणारे अनुदान अशा अनुकूल  धोरणामुळे साखर उद्योग क्षेत्रात यंदा तेजीचे वातावरण आहे. उत्तम व्यवस्थापन असलेल्या कारखान्यांनी या अनुकूलतेत चांगलच आर्थिक लाभ करून घेतला असल्याची प्रतिक्रिया जेएम फायनान्शियल सर्व्हिसेसचे विश्लेषक अचल लोहाडे यांनी व्यक्त केली आहे.   

पेट्रोल आणि अल्कोहोल आयातीवरील खर्चाच विचार करता केंद्र सरकार सध्या साखरेचे अतिरिक्त उत्पादन इथेनॉलनिर्मितीकडे वळवण्यासाठी विशेष प्रयत्न करत आहे. इथेनॉल मिश्रणाचे उद्दिष्ट साध्य करून कार्बन उत्सर्जनात घट आणण्यासाठी सरकारचे हे विशेष प्रयत्न सुरु असल्याचेही लोहाडे यांनी नमूद केले आहे.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com