
देशात आर्टिफिशयल इंटेलिजन्सला (कृत्रिम बुद्धिमता) (Artificial Intelligence) चालना देण्यासाठी तीन केंद्र उभारण्याची घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitaraman) यांनी केली.
कृषी, आरोग्य आणि शाश्वत शहरांच्या विकासासाठी आर्टिफिशयल इंटेलिजन्सचा वापर करण्याची गरज असल्याचे मतही त्यांनी अर्थसंकल्पातील भाषणात सांगितले.
बुधवारी (ता.१) अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्प सादर केला. लोकसभा निवडणुकापूर्वीचा अर्थसंकल्प आहे.
कृषी क्षेत्रातील अडचणी कमी करण्यासाठी आर्टिफिशयल इंटेलिजन्सचा फायदा होऊ शकतो.
कृषी क्षेत्रात जसे की, सिंचन, बाजार, विमा आणि कृषी उद्योगांची वाढ या डिजिटल प्लॅटफॉर्ममधून करण्यात येणार आहे.
शेती आणि ग्रामीण भगातील स्टार्टअपच्या मदतीने नव तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहचविले जाणार आहे.
त्यातून शेतकऱ्यांच्या अडचणी कमी करण्यात येतील. त्यासाठी कृषी स्टार्टअपला प्रोत्साहन देण्याची घोषणाही अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पात केली आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.