
डॉ. भगवानराव कापसे फळबाग तज्ञ औरंगाबाद
अर्थसंकल्पामध्ये (Union Budget 2023) शेतीच्या डिजिटेलायझेशनवर (Agriculture Digitalization) मोठ्या प्रमाणात भर देण्यात आला आहे ही अत्यंत उत्साहवर्धक बाब आहे. मात्र त्याच बरोबर सेंद्रिय शेतीस सुद्धा प्राधान्य हे थोडे विसंगत वाटते.
डेअरी आणि फिशरीज (Dairy And Fisheries) उद्योगांना प्रमोशन,शेतकऱ्यांना वीस लाखापर्यंत कृषी कर्ज (Agriculture Loan) आणि व्याजामध्ये सवलत ही चांगली बाब म्हणता येईल. सर्वात महत्त्वाच म्हणजे फलोत्पादन (Horticulture) लागवडीसाठी 2200 कोटी रुपयांची तरतूद फलोत्पादन वाढीसाठी नक्कीच फायद्याची ठरणार आहे.
त्याचबरोबर इतर स्टार्टप्सच्या (Startups) धरतीवर कृषीमध्ये सुद्धा स्टार्टप्सना खास मदत देण्याचे धोरण कृषी उद्योग वाढीसाठी व कृषी माल मूल्यवृद्धीसाठी नक्कीच फायद्याचे ठरू शकते. ज्वारी, बाजरी ,राळा, भगर, नाचणी या बाबीस यावर्षी मुळातच तृणधान्य वर्ष जगामध्ये साजरे करण्यात येत असल्याने प्रोत्साहन ही चांगली बाब आहे.
मिलेटचे राष्ट्रीय संशोधन केंद्र हैदराबाद येथे आहे. वास्तविक पाहता ही तृणधान्ये मुख्यतः महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात होतात. त्यामुळे महाराष्ट्रासाठी काही खास प्रोत्साहन पर योजना दिली असती तर अधिक उपयुक्त झाले असते.
मागास भागातील कृषीच्या सहकारी सोसायट्यांना खास मदत त्याचबरोबर बायोगॅससाठी दहा हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
अर्थसंकल्पामध्ये गंगा गोदावरी जोडणे, निर्यातीसाठी खास प्रोत्साहन म्हणून विमान भाड्यासाठी 30 टक्केपर्यंत सवलत, धरणाचे पाणी पाईपलाईनद्वारे शेतकऱ्यास पुरवठा इत्यादी अतिशय महत्त्वाच्या बाबीकडे मात्र दुर्लक्ष केल्याचे दिसते.
शेतकऱ्यांना सोलार पंपसाठी अनुदानासाठी खास तरतूद असणे सुद्धा आवश्यक होते. त्याचा सुद्धा अंतर्भाव अर्थसंकल्पात दिसत नाही. हा अर्थसंकल्प शेतीसाठी सर्वसाधारण बरा असेच म्हणता येईल.
डॉ. भगवानराव कापसे फळबाग तज्ञ औरंगाबाद
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.