दहा साखर कारखान्यांना गाळप परवाने नाकारले

सोलापूर ः मुख्यमंत्री निधी जमा न केल्याने आणि शेतकऱ्यांची ऊसबिले अदा न केल्याने सोलापूर जिल्ह्यातील दहा साखर कारखान्यांना अद्यापही गाळप परवाने मिळू शकलेले नाहीत. त्यामुळे या कारखान्यास शेतकऱ्यांची अडचण झाली आहे.
To ten sugar factories Filter licenses denied
To ten sugar factories Filter licenses denied

सोलापूर ः मुख्यमंत्री निधी जमा न केल्याने आणि शेतकऱ्यांची ऊसबिले अदा न केल्याने सोलापूर जिल्ह्यातील दहा साखर कारखान्यांना अद्यापही गाळप परवाने मिळू शकलेले नाहीत. त्यामुळे या कारखान्यास शेतकऱ्यांची अडचण झाली आहे. गेल्या पंधरवड्यापासून जिल्ह्यातील २० साखर कारखान्यात गाळप सुरू झाले आहे. पण अद्यापही गाळपाची परवानगी मागणाऱ्या दहा साखर कारखान्यांना परवाने मिळाले नाहीत. जिल्ह्यातील मातोश्री, सिद्धनाथ, संत कूर्मदास, भीमा सहकारी साखर कारखान्यांसह उस्मानाबाद जिल्ह्यातील काही कारखान्यांचा यात समावेश आहे. या साखर कारखान्यांनी मागील हंगामात गाळप केलेल्या उसाला प्रतिटन पाच रुपये मुख्यमंत्री निधीत जमा करावे लागतात, या साखर कारखान्यांनी हा निधी तर दिला नाहीच, पण गतवर्षीची एफआरपीची बिलेही थकविली. त्यामुळे या कारखान्यांना परवाने नाकारण्यात आल्याचे सांगण्यात आले. वीस कारखान्यात गाळप सध्या सुरू असलेल्या वीस साखर कारखान्यातून १० लाख ९४ हजार मेट्रिक टन उसाचे गाळप झाले आहे. तर ८ लाख ४९ हजार क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. तर सरासरी ७.७५ टक्के इतका उतारा मिळाला आहे. शेतकऱ्यांची अडचण परवान्याच्या प्रतीक्षेत असलेल्या साखर कारखान्यांनी गाळपाची पूर्ण तयारी केली आहे. त्यासाठी कारखाना प्रशासन आणि साखर आयुक्तालय यांच्यात चर्चा सुरू असल्याचे सांगण्यात आले. पण यामध्ये ऊस उत्पादकांची मात्र अडचण झाली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com