बंगालमध्ये हिंसाचारात ८ जणांचा मृत्यू

कोलकता: पश्‍चिम बंगालमध्ये बीरभूम येथे तृणमूल कॉंग्रेसच्या नेत्याच्या हत्येनंतर उसळेल्या हिंसाचारात ८ जणांचा मृत्यू झाला. बागूती गावात तृणमूल कॉंग्रेसचे नेते बहादूर शेख यांची हत्या झाल्यानंतर रामपूरहाट येथे हिंसाचार उसळला आणि कार्यकर्त्यांनी दहा ते बारा घरांना आगी लावल्या.
there were 8 people killed in Bengal violence
there were 8 people killed in Bengal violence

कोलकता: पश्‍चिम बंगालमध्ये बीरभूम येथे तृणमूल कॉंग्रेसच्या नेत्याच्या हत्येनंतर उसळेल्या हिंसाचारात ८ जणांचा मृत्यू झाला. बागूती गावात तृणमूल कॉंग्रेसचे नेते बहादूर शेख (Bahadur Shekh) यांची हत्या झाल्यानंतर रामपूरहाट येथे हिंसाचार उसळला आणि कार्यकर्त्यांनी दहा ते बारा घरांना आगी लावल्या. यात ८ जणांचा होरपळून मृत्यू झाला. एकाच घरातून सात जणांचे मृतदेह हाती लागले. हिंसाचारप्रकरणी ११ जणांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shaha) यांनी हिंसाचारप्रकरणी अहवाल मागितला आहे. हेही पाहा-फळबाग लागवडीचे उद्दिष्ट १ लाख हेक्टरवर ! काय म्हणाले फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे ?

रामपूरहाटचे तृणमूल कॉंग्रेसचे आणि ग्रामपंचायतीचे नेते बहादूर शेख हे काल रात्री राज्य महामार्ग ५० वरून जात असताना त्यांच्यावर अज्ञात व्यक्तीने बॉम्ब फेकला. यात ते गंभीर जखमी झाल्याने त्यांना रामपूरहाट वैद्यकीय महाविद्यालयात नेण्यात आले. परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेची माहिती कळताच तृणमूल कॉंग्रेसचे कार्यकर्ते भडकले. रामपूरहाट (Rampurhat) येथे तणावाचे वातावरण निर्माण झाले आणि कार्यकर्त्यांनी आणि सर्मथकांनी संशयितांच्या घरांचे दरवाजे बाहेरून बंद करत आग लावली. यात ८ जणांचा होरपळून मृत्यू झाला. त्यांचे मृतदेह बाहेर काढले असून यात एकाच घरातील सात मृतदेहांचा समावेश आहे. घटनास्थळी वाढता तणाव पाहता पोलिसांचा मोठा फौजफाटा दाखल झाला.

हिंसाचारात आग लागली नाही: तृणमूल

रामपूरहाट येथील स्थानिक नागरिकांनी तृणमूल कॉंग्रेसच्या एका गटाने घरांना आगी लावल्याचे म्हटले आहे. परंतु तृणमूल कॉंग्रेसने आरोप फेटाळून लावले आहे. बिरभूमचे तृणमूल नेते अनुव्रत मंडळ यांनी म्हटले, की घरांना शॉटसर्किटमुळे (Shortcircuit) आग लागली. काल रात्री गावात कोणताही हिंसाचार झाला नाही. तृणमूल कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी हिंसाचार केलेला नसल्याचे मंडळ म्हणाले.

एसआयटी स्थापन

रामपूरहाट येथील हिंसाचारप्रकरणी बंगाल सरकारने अतिरिक्त पोलीस महासंचालक (सीआयडी) ज्ञानवंत सिंह यांच्या अध्यक्षतेखाली तीन सदस्यीय विशेष तपास पथक नियुक्त केले. पश्‍चिम विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक संजय सिंह आणि सीआयडीचे अधिकारी मीरज खालिद यांचा पथकात समावेश आहे. या हिंसाचारावरून भाजपने मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या राजीनाम्याची मागणी केली. प्रदेशाध्यक्ष सुकांत मजूमदार म्हणाले, की बंगालमधील कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे ढासळली आहे. ममता बॅनर्जी यांनी तत्काळ राजीनामा द्यायला हवा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com