
Amravati Rain : रब्बी हंगामातील शेतकऱ्यांवर पुन्हा एक संकट दारावर येऊन ठेपले आहे. विदर्भात गारपिटीची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.
त्यामुळे काढणी सुरू असलेला हरभरा व ओंबींवरील गहू, तोडणीवरील मृग बहारातील संत्रा व मोहोरेलला आंबा धोक्यात आला आहे. कांद्यालाही फटका बसण्याची शक्यता आहे.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार पश्चिम हिमालयाजवळ पश्चिमी विक्षोभ सक्रिय असून तो हळूहळू पूर्व दिशेला सरकत आहे. तसेच राजस्थान वर हवेच्या खालच्या थरात चक्राकार वारे आहेत.
हवेच्या मधल्या थरात वाहणारे पश्चिमेकडील वारे आणि खालच्या थरात पूर्वेकडून वाहणारे वारे यांचा संगम दक्षिण भारतावर होत असल्याने गारपीट होण्याची दाट संभावना निर्माण झाली आहे.
शुक्रवारी (ता. १७) अमरावती, वाशीम, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यांत बरेच ठिकाणी हलक्या व मध्यम पावसाची शक्यता आहे.
तर चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ जिल्ह्यांत गारपीट होण्याची शक्यता असल्याची माहिती श्री. शिवाजी कृषी महाविद्यालयाचे प्रा. अनिल बंड यांनी दिली.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.