
Rain Update News : नगर जिल्ह्यातील अनेक भागांत गुरुवारी (ता. १६) उशिरा वादळी पावसाने पुन्हा हजेरी लावली. वादळी वाऱ्यासह पावसाच्या सरी कोसळल्या.
वादळी वाऱ्यासह झालेल्या या पावसाने रब्बी हंगामातील गहू, हरभरा, ज्वारी या पिकांसह आंबा, द्राक्ष (Grape), संत्री-मोसंबी या फळबागांचेही नुकसान (Orange Orchard Damage) झाले.
नगर जिल्ह्यात मागील आठवड्यात वादळी पाऊस झाला. या पावसाने सुमारे पाच हजार शेतकऱ्यांच्या पिकांना फटका बसला. गुरुवारी सायंकाळी उशिरा पुन्हा नगर जिल्ह्याच्या उत्तरेतील श्रीरामपूर, राहुरीच्या काही भागात पावसाने हजेरी लावली.
दक्षिण भागातील नगर तालुका, जामखेड, श्रीगोंदे, पारनेर आणि अहमदनगर शहरात सायंकाळी पाचपासूनच सोसाट्याच्या वाऱ्यास सुरुवात झाली. त्यानंतर काही वेळातच विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली.
अहमदनगर शहरात पावसामुळे वीजपुरवठा खंडित झाला. मध्यम स्वरूपाचा पाऊस सुमारे अर्धा तास झाला. जिल्ह्यात गव्हाची काढणी सुरू आहे.
त्यामुळे काढणीला आलेल्या गव्हाचे तसेच हरभऱा, ज्वारीचे पावसाने नुकसान झाले. वाऱ्यामुळे आंब्याची फळ व मोहर गळती झाली. द्राक्षालाही याचा फटका बसला.
सातारा जिल्ह्यात हलका पाऊस
सातारा जिल्ह्यात गुरुवारी (ता. १६) काही ठिकाणी हलका पाऊस झाला. दुपारपासून ढगाळ वातावरण होऊन पावसास सुरुवात झाली. बुधवारच्या (ता. १५) तुलनेत गुरुवारी पावसाचे प्रमाण कमी होते. पावसामुळे रब्बी पिकांचे नुकसान सुरू आहे.
फळ पिकांना या पावसाचा फटका बसणार आहे. शुक्रवारी (ता. १७) सकाळी धुके पडले होते. त्यानंतर दुपारपर्यंत बहुतांश भागात ढगाळ वातावरण झाले होते. जिल्ह्यात ढगाळ वातावरणामुळे पावसाची शक्यता असून पीक नुकसानीच्या भीतीने शेतकरी धास्तावला आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.