
kettur Rain News : करमाळा तालुक्यातील केत्तूर परिसरात गुरुवारी (ता. १६) सायंकाळच्या सुमारास वादळी वारे, विजांचा कडकडाट व ढगांच्या गडगडाटासह रिमझिम पावसाच्या सरी कोसळण्यास सुरवात झाली.
यामुळे आधीच मिळणारा कवडीमोल बाजारभाव व दोन दिवसांपासून चालू झालेल्या अवकाळी पावसापुढे येथील शेतकरी राजा हतबल झाला आहे.
परिसरात गुरुवारी दिवसभर ढगाळ वातावरण होते. सायंकाळी साडेचार वाजल्यानंतर काळेकुट्ट ढग दाटून आले व काही वेळात विजांच्या कडकडाटासह रिमझिम पाऊस पडण्यास सुरवात झाली.
सध्या अनेक शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील गहू, कांदा यांसारखी पिके काढून ठेवली आहेत, तर काही काढणीच्या तयारीत आहेत. यातच चार दिवस अवकाळी पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला होता.
त्यानुसार गेल्या दोन दिवसांपासून राज्यात बहुतांश ठिकाणी अवकाळी पाऊस पडण्यास सुरवात झाली आहे. अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे येथील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात नुकसानीस सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.
आधीच शेतकऱ्यांच्या शेतमालाला बाजारभाव मिळत नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला होता. आता त्यात निसर्गाने शेतकऱ्यांची साथ सोडल्याने शेतकऱ्यांची अवस्था ‘करो या मरो’ अशी झाली आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.