
१९ मार्चपर्यंत महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड या राज्यांमध्ये अनेक भागांत वादळी वारे आणि विजांसह हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे.
भारतीय हवामानशास्त्र विभागाने हा अंदाज वर्तवला आहे.
तसेच विदर्भ, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये आज (ता. १७) अनेक ठिकाणी गारपीट होण्याचा अंदाज आहे.
हवामान विभागाने उत्तर भारतातही १९ मार्चपर्यंत पावसाचा अंदाज सांगितला आहे.
पंजाब, हरियाणा, राजस्थानमध्ये वादळी वारे, विजांसह पाऊस आणि गारपीट होण्याची शक्यता आहे.
या अवकाळी पावसामुळे आणि जोरदार वारे, गारपीटीमुळे रब्बीचा हंगाम अडचणीत आला आहे.
शेतातील उभ्या रब्बी पिकांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे.
राज्यात गहू, हरभरा, द्राक्ष आदी पिकांचे मोठे नुकसान होण्याची चिन्हे असल्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत.
तर उत्तर भारतात काढणीला आलेल्या गव्हाला मोठा फटका बसण्याची भीती आहे. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास प्रतिकूल हवामानामुळे हिरावून घेतला जाणार आहे.
दरम्यान, राज्यात ज्या शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झालेले आहे, त्यांनी तातडीने विमा भरपाईसाठी पूर्वसूचना देण्याची प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन जाणकारांनी केले आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.