
कृषी यांत्रिकीकरणात भारताची झपाट्याने प्रगती होत आहे. भारताची कृषी यंत्र, अवजारांची बाजारपेठ चीनच्या ताब्यात गेल्याचे चित्र आहे.
चीनमधून मोठ्या प्रमाणात कृषी यंत्रांची आयात होत असल्याचा आरोप देशांतर्गत उद्योजकांनी केला आहे.
जवळपास ५३ टक्के बिगर ट्रॅक्टर यंत्रे (नॉन ट्रॅक्टर फार्म मशिनरी) आता चीनमधून येत आहेत. भारतीय उद्योगांचे खच्चीकरण होत आहे.
चीनमधील कृषियंत्रे, अवजारांची आयात रोखायला हवी. यासाठी देशातील उद्योजकांना अधिकाधिक सवलतींसह शेतकऱ्यांना गुणवत्तापूर्ण अवजारे कमी खर्चात देण्याची गरज आहे.
अन्यथा येत्या १० वर्षात भारतीय कृषीयंत्रांची बाजारपेठ चीनच्या ताब्यात जाण्याची भीती यंत्रनिर्मिती क्षेत्रातून व्यक्त होत आहे.
२०२२ ते २०२७ या कालावधीत चीनमधील कृषियंत्रे उद्योगाच्या विकासाचा दर ५.८ टक्के इतका मजबूत राहण्याची शक्यता आहे.
चीनने तब्बल २५०० कृषियंत्रे निर्मिती प्रकल्प उभारून भारतासह जगातील प्रमुख देशांच्या कृषियंत्रे उत्पादक कंपन्यांसमोर मोठी स्पर्धा उभी केली आहे.
एकीकडे चीन कृषियंत्र, अवजारांची मोठ्या प्रमाणात निर्यात करत भारताची बाजारपेठ काबीज करत आहे. तर दुसरीकडे स्वतःची बाजारपेठ अबाधित ठेवण्यासाठी अनुदानाचा मारा करत आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.