
अमरावती जिल्ह्यातील वरुड, मोर्शी हे दोन्ही तालुके संत्रा लागवडीसाठी प्रसिद्ध आहेत. परंतु या तालुक्यांची दुसरी बाजू म्हणजे पाण्याचा अति उपसा झाल्यामुळे ड्रायझोनमध्ये समावेश होत पाणी उपशावर बंदी आहे. या परिस्थितीवर मात करत डॉ. विजय देशमुख यांनी १६० शेतकऱ्यांना संघटित करून १२० हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आणण्याची किमया साधली. विदर्भात संत्र्याखालील सर्वाधिक एक लाख हेक्टर क्षेत्र अमरावती जिल्ह्यात आहे. यातील वरुड, मोर्शी तालुके आघाडीवर आहेत. संत्रा बागेला पाण्याची अधिक गरज असते. त्यामुळे या दोन्ही तालुक्यांत पाण्याचा अतिरेकी उपसा झाला. त्याच वेळी जलपुनर्भरणाकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे भूजल पातळी तब्बल ९०० फुटांखाली गेली आहे. त्यामुळे शासनाने या दोन्ही तालुक्यांत कूपनलिका आणि विहीर खोदण्यास मनाई करीत ड्रायझोनमध्ये समावेश केला. ‘गंगा आली हो अंगणी’ वरुड तालुक्यातील सातपुडा पायथ्याशी चुडामण नदीवर नागठाणा प्रकल्प आहे. या प्रकल्पावर १९९४ मध्ये ११ कोल्हापुरी बंधारे बांधण्यात आले होते. या बंधाऱ्यांमुळे लगतच्या विहिरींची पातळी वाढेल, अशी अपेक्षा होती. परंतु शेतकऱ्यांनी या बंधाऱ्यातील पाण्याचा उपसा सुरू केला. त्यामुळे विहिरींची पातळी वाढण्याचा उद्देश साध्य झाला नाही. याच भागातील डॉ. विजय देशमुख यांची सात एकर संत्रा बाग प्रकल्पापासून दहा किलोमीटरवर आहे. शाश्वत पाण्याची उपलब्धता होण्यासाठी डॉ. देशमुख यांनी परिसरातील समविचारी शेतकऱ्यांना एकत्र करून बंधाऱ्यावरून पाइपलाइन करून फळबागांना पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला. शाश्वत सिंचनाची सोय शेतकऱ्यांकडे शाश्वत सिंचनाची सोय असेल तरच आंबिया बहर घेतला जातो. शरद पाणी वापर संस्थेतील सभासदांकडे हा पर्याय उपलब्ध झाला आहे. त्यामुळे आंबिया बहर घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या वाढीस लागली आहे. १६० सभासद असलेल्या या संस्थेमुळे १२० हेक्टर ओलित शक्य झाले आहे. ...असे आहे शुल्क प्रति वर्ष प्रति हेक्टरी ३,५०० रुपये पाणीपट्टी सभासदांकडून आकारले जाते. यातून एका कर्मचाऱ्याला व्यवस्थापनासाठी लागणारा पगार दिला जातो. त्यासोबतच पाणीवापरापोटी पाटबंधारे विभागाला ७० हजार रुपयांचा भरणा केला जातो. संस्थेची कार्यप्रणाली पारदर्शी असून स्वतंत्र बॅंक खात्याच्या माध्यमातून हिशेब ठेवला जातो. संस्थेच्या बॅंक खात्यात आजमितीस २६ लाख रुपयांची रक्कम आहे. संस्थेचा गौरव
प्रकल्पातून पाणीपुरवठ्याचे नियोजन नागठाणा प्रकल्पावर ११ कोल्हापुरी बंधारे आहेत. यापैकी तीन बंधाऱ्यातील पाणी शेतकऱ्यांच्या पाणी वापर संस्थेला द्यावे, असा प्रस्ताव डॉ. देशमुख यांनी पाटबंधारे विभागाकडे दिला. या प्रस्तावाला पाटबंधारे विभागाने मान्यता दिली. पाणी उपसा संदर्भातील प्रस्ताव मान्य होताच २००६ मध्ये डॉ. देशमुख यांनी १६० शेतकऱ्यांचा सहभाग असलेली शरद पाणी वापर ठिबक सिंचन सहकारी संस्थेची नोंदणी केली. त्यातून पुढे पाणीपुरवठा पाइपलाइनचे काम सुरू झाले. तत्कालीन कृषिमंत्री व आमदार हर्षवर्धन देशमुख यांचा पुढाकार पाटबंधारे विभागाचे तत्कालीन अभियंता किशोर गावंडे यांच्या सहकार्याने हे काम पूर्णत्वास गेले.
वेळापत्रकानुसार पाणीपुरवठा
पुनर्भरणातून समृद्धी पावसाळ्यात प्रकल्प ओव्हरफ्लो होतो. ऑगस्ट ते डिसेंबरपर्यंत हे अतिरिक्त पाणी पाइपलाइनद्वारे उपसा करून संस्था सभासद शेतकऱ्यांच्या शेतातील विहिरीत सोडले जाते. यामुळे लगतच्या शेतकऱ्यांच्या विहिरींची पाणीपातळी वाढण्यास मदत झाली आहे. - डॉ. विजय देशमुख. ७६२०११७०७९, ९४२२१५७७५४
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.