कोल्हापूर जिल्ह्यातील कणेरी (ता. करवीर) येथील दयावान श्रीकांत पाटील हा युवा शेतकरी दहा वर्षांपासून सातेरी मधमाशीपालनात सातत्य ठेवून आहे. स्वतःच्या शेतात परागीभवनासाठी मधपेट्या ठेवण्याबरोबरच अन्यत्रही तो पेट्या ठेवण्यास देतो. शेतकऱ्यांना मधुमक्षिकापालनाचे प्रशिक्षण देत त्यांच्या संवर्धन चळवळीला त्याने मोठा हातभारही लावला आहे. कोल्हापूर शहरापासून दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या कणेरी (ता. करवीर) येथे दयावान श्रीकांत पाटील या तरुणाची अडीच एकर शेती आहे. भात, भुईमूग, भाजीपाला व उसाचे उत्पादन घेतात. महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाच त्यांना लघू उद्योगाविषयी आत्मीयता निर्माण झाली. यातूनच त्यांनी मधुमक्षिकापालनाकडे लक्ष दिले. पुणे येथील मध्यवर्ती मधमाशी संशोधन आणि प्रशिक्षण संस्था (सीबीआरआयटी) येथे त्यासाठी रीतसर प्रशिक्षण घेतले. ही साधारण २०१० च्या सुमाराची गोष्ट आहे. गावापासून प्रसिद्ध कणेरी मठ जवळच आहे. मठाधिपती श्री काडसिद्धेश्वर महाराज यांनी दयावान यांना या पूरक व्यवसायासाठी अधिक प्रोत्साहन दिले. सुरुवातीचे काही दिवस त्या परिसरात मधपेट्या ठेवून मधाचे उत्पादन घेण्यास सुरू केले. परंतु नैसर्गिक परिस्थितीमुळे अपेक्षित उत्पादन येत नसल्याने पर्याय शोधायला सुरुवात केली. दहा पेट्यांपासून सुरुवात कोल्हापूर जिल्ह्यात जैवविविधता मोठी आहे. दाजीपूरसारखे अभयारण्य आहे. तेथे जाऊन या व्यवसायास चालना द्यावी असा विचार त्यांच्या मनात आला. त्यानुसार धनराज यांनी तेथील वातावरणाची माहिती घेतली. अभयारण्याच्या शेजारील परिसरात सुरुवातीला १० मधपेट्या ठेवल्या. त्यासाठी एक लाख रुपये भांडवल गुंतवले. तेथील अधिकाऱ्यांनाही या कल्पनेस प्रोत्साहन दिले. तेव्हापासून आजतागायत ही पद्धत अमलात आणली आहे. पेट्या बसविल्यानंतर ठरावीक दिवसांनी तिथे जाऊन परिस्थिती पाहिली जाते. धनराज यांच्यासोबत तीन मजूर काम करतात. मधाचे संकलन व विक्री व्यवस्था
परागीभवनासाठी प्रयत्न दयावान सांगतात, की निसर्गात मधमाश्यांची संख्या कमी झाल्यास परागीभवन होत नाही. त्यामुळे फळधारणा होत नाही. उत्पादनावर त्याचा परिणाम होतो. कणेरी येथील काही शेतकऱ्यांच्या शेतात आम्ही पेट्या ठेवण्याचा चांगला परिणाम पाहिला आहे. अनेक शेतकऱ्यांना त्यापासून प्रेरणा मिळाली आहे. त्यासाठी पेट्या मोफत देत आहे. मध पेट्यांचे उत्पादन व्यवसाय वृद्धी करताना यंदापासून मधपेट्या तयार करण्याचा व्यवसाय सुरू केला आहे. सध्या कोरोना संकटामुळे कारागीर नसल्याने त्यात नियमितता नाही. शेतकऱ्यांच्या मागणीनुसार त्याची विक्री सुरू केली आहे. प्रति रिकामी पेटी १८०० रुपयांच्या आसपास विकली जाते. भविष्यात मधपालनासाठी ज्या निविष्ठा लागतील त्याही पुरवण्याचा विचार आहे. कणेरी मठ, कृषी विज्ञान केंद्र, जिल्हा खादी ग्रामोद्योग, शिवाजी विद्यापीठातील कीटकशास्त्र विभागाचे डॉ. ए. डी. जाधव यांच्यासह विविध संस्थांच्या संपर्कात दयावान असतात. विविध उपक्रम
-दयावान पाटील, ९०९६३८५७१२
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.