
तेलकट डाग, सूत्रकृमी किंवा अन्य कारणांमुळे राज्यातील अनेक शेतकऱ्यांना आपल्या बागा काढून टाकाव्या लागल्या. राहुल रसाळ यांनी मात्र आपल्या १५ एकरांत भगवा डाळिंब बागेत निर्यातक्षम उत्पादनाचा आदर्श तयार केला आहे. पूर्ण बाग ‘रेसिड्यू फ्री’ तत्त्वावर आणि ‘अनारनेट’ नोंदणीकृत आहे. उत्कृष्ट कॅनॉपी व निरोगी बागेत एकसारख्या आकाराची, आकर्षक भगव्या रंगाची, अनोखी चमकदार, डागविरहित लगडलेली फळे दिसतात. टिकवणक्षमताही चांगली आहे. सन २०१६ मध्ये लागवड असलेल्या बागेत तिसऱ्या वर्षापासून उत्पादन घेण्यास सुरुवात केली. ...असे रोखले तेलकट डाग रोगाला राहुल सांगतात, की डाळिंब हे उष्णकटीबंधीय फळ आहे. पाणी जास्त झाल्यास नत्र जास्त होतो आणि तेलकट डाग रोग वाढतो. माझ्या बागेत एकूण चार हजार झाडांमध्ये ३५ ते ४० झाडांमध्येच कुठेतरी त्याची लक्षणे दिसू शकतील. रोगाचे बहुतांश नियंत्रण पाणी, अन्नद्रव्ये व नत्र-कर्ब गुणोत्तर जोपासण्यातून केले आहे. डबल लॅटरल व प्रति ४० सेंटिमीटरला १.६ लिटरचे डिस्चार्ज असलेले ड्रीपर आहेत. ८ ते ९ दिवसांतून फक्त २० ते २५ मिनिटे पाणी देतो. ‘डेल्टा टी तंत्रा’द्वारे रात्री १० वाजता फवारणी सुरू होऊन ती मध्यरात्रीपर्यंत चालते. तज्ज्ञांचे विवेचन महात्मा फुले कृषी विद्यापीठातील मृद्शास्त्रज्ञ डॉ. अनिल दुरगुडे यांनी राहुल यांच्या शेतीला भेट दिली आहे. ते म्हणाले, की मातीचा प्रकार, पाण्याची गुणवत्ता व हवामान यांचा अभ्यास करून राहुल यांनी शेती जोपासली आहे. जमिनीसाठी कर्ब व नत्र गुणोत्तर तर वनस्पतीसाठी कार्बोहायड्रेटस व नत्र यांचे गुणोत्तर महत्त्वाचे असते. बहरासाठी कृत्रीम रसायने न वापरता नैसर्गिक ताण व्यवस्थित दिला, तर बहर व्यवस्थापन चांगले करता येते असेच राहुल यांच्या नियोजनातून दिसते. राहुल यांच्या व्यवस्थापनातील बाबी
उत्पादन, विक्री
वर्षभर पैसा देणारे हुकमी कारले कारले हे राहुल यांचे हुकमी व बाराही महिने तीन- चार एकरांत घेतले जाणारे पीक आहे. कारल्याला श्रावण वा सप्टेंबर काळात सर्वाधिक व हमखास दर असतात. त्या वेळी प्लॉट सुरू होईल असे लागवडीचे नियोजन असते. हे पीक मोठ्या प्रमाणात फारसे कोणी करीत नाही. अनेक शेतकरी ते पावसाळ्यात घेऊ शकत नाहीत किंवा कांदा व भुसार पिकांसाठी क्षेत्र राखीव असते. हा फायदा आम्हाला मिळतो असे राहुल सांगतात. व्यवस्थापनातील ठळक बाबी
उत्पादन व उत्पन्न
अन्नद्रव्यांचे नियोजन
तज्ज्ञांचे विवेचन डॉ. दुरगुडे सांगतात, की चुनखडीयुक्त जमिनीकडून सल्फेटयुक्त रासायनिक खतांना चांगला प्रतिसाद मिळतो. अशा जमिनीत विद्राव्य रूपातील फॉस्फरस दिल्यास मुळ्यांची वाढ चांगली होते. अन्नद्रव्ये शोषून घेण्याची क्षमता वाढते. कॅल्शिअमयुक्त जमिनीत मॅग्नेशिअमची कमतरता जाणवते. मॅग्नेशिअम हा पानांतील क्लोरोफिल (हरितद्रव्य) सिंथेसिससाठी व अन्ननिर्मितीसाठी महत्त्वाचे कार्य करतो. राहुल यांनी या अनुषंगाने खतांचे नियोजन केलेले पाहण्यास मिळते.
शेणखताचा कुजवून वापर राहुल बिगर कुजवलेले काहीच जमिनीत वापरत नाहीत. सेंद्रिय खत वापरण्यापूर्वी ते जी प्रक्रिया करतात ती पुढीलप्रमाणे. ३० टक्के शेणखत, ३० टक्के कारखान्याचे बगॅस, ३० टक्के प्रेसमड अधिक डाळिंबासाठी १० टक्के कारखान्याची राख तर अन्य पिकांसाठी (द्राक्षे, भाजीपाला) त्याऐवजी १० टक्के पोल्ट्रीखत. डेपो लावून सूर्यप्रकाशाद्वारे या घटकांच्या विघटनाची प्रक्रिया सुरू होते. त्यातून चांगली उष्णता उत्सर्जित होते. या प्रक्रियेमुळे मूळकुजीचा धोकाही कमी केला जातो. ज्या वर्षी वापर करायचा त्याच्या ९ ते १२ महिने आधी ही निर्मिती सुरू होते. म्हणजे वापरावयाच्या वर्षी तयार दर्जेदार ह्यूमस उपलब्ध होते. वापर- दरवर्षी. एकरी २० ब्रास प्रति पीक. काढणीनंतर. संपर्क- राहुल रसाळ, ९७६६५५०६२४
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.