
Crop Damage News सिंधुदुर्गनगरी ः जिल्ह्यात झालेल्या वादळी वाऱ्यानंतर काजू पीक (Cashew Crop Damage) धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
वादळाचा तडाखा बसलेल्या भागातील काजूची कोवळी बी (Cashew Seed) वर काळेडाग पडलेले दिसून येत आहेत. याशिवाय काजूच्या झाडावरील मोहोर देखील काळवंडला आहे.
जिल्ह्यात यावर्षी चांगली थंडी पडल्यामुळे काजूंना चांगला मोहोर आला होता. परंतु मोहोराला फळधारणा होण्याच्या कालावधीत जिल्ह्यात धुक्याचे प्रमाण वाढले.
त्यामुळे काही प्रमाणात मोहोर काळवंडला होता. परंतु काजू पिकाचे सर्वाधीक नुकसान वादळी वाऱ्यामुळे झाले आहे. १२ फेब्रुवारी ते १५ फेब्रुवारी या कालावधीत जिल्ह्याच्या काही भागात जोरदार वारे वाहत होते.
या वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी काजू बी, काजूची झाडे कोसळून पडली.जिल्ह्याच्या पूर्वपट्ट्यात मोठ्या प्रमाणात वारे वाहत होते.काजूची पाने देखील गळून पडली. झाडे पिळवटल्यामुळे झाडावर असलेल्या कोवळ्या बी वर देखील आता काळे डाग पडण्यास सुरुवात झाली आहे.
पूर्ण बोंड न पिकता अर्धवट बोंडुवरच काजू बी तयार होत आहे. काजू बीची पूर्ण वाढ होताना दिसत नाही. त्यामुळे या काजू बीचे वजन देखील कमी होणार आहे. वादळी वाऱ्याचा हा परिणाम जाणवत असल्याचे बागायतदारांकडून सांगितले जात आहे. काजू उत्पादनावर मोठा परिणाम होणार आहे.
वादळी वाऱ्यामुळे काजूच्या फांद्या पिळवटून गेल्या.याशिवाय पानांची देखील मोठ्या प्रमाणात गळ झाली.त्यामुळे कोवळ्या काजू बीला आवश्यक अन्नद्रव्य मिळण्याची प्रकिया थांबली गेल्याने काजू बी देठातच तयार होणे, बोंडू तयार न होणे, असे प्रकार घडत आहेत.
- प्रा. विवेक कदम, कृषी महाविद्यालय, सांगुळवाडी
तीन चार दिवस सलग जोरदार वारे वाहत असल्यामुळे काजूचे मोठे नुकसान झाले आहे. वाऱ्याने काजू बी पडली, पाने गळून पडली. परंतु त्यापेक्षा अधिक दुष्परिणाम आता दिसून येत आहेत.
- मंगेश गुरव, काजू उत्पादक, खांबाळे, ता. वैभववाडी
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.