तळा, जि. रायगड : काही दिवसांपासून थंडीचा कडाका (Cold Weather) वाढला आहे. त्याचा परिणाम वाल पिकांवर (Effect of climate on crop) होत आहे. फुलगळतीमुळे वालाच्या शेंगा लांबणीवर जाण्याची शक्यता आहे. यामुळे काही प्रमाणात शेतकऱ्यांना तोटा सहन करावा लागणार आहे.
भातशेतीबरोबर शेतकरी कडधान्यांचे पीक घेत असतात. ही पिके काहीतरी देऊन जातील, अशी आशा शेतकऱ्यांना असते. उत्पादन चांगले झाल्यास नकद पैसे हाती येतात.
परंतु, या वर्षी ढगाळ वातावरण, थंडी यामुळे कडधान्य पिकांवर त्याचा परिणाम होण्याची दाट शक्यता आहे. काही दिवसांपासून कडक थंडीचा परिणाम झाला आहे. या वर्षी वाल पीक अधिक प्रमाणात येणार नाही, अशी शेतकऱ्यां अंदाज आहे.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.