नाशिक : नाशिक जिल्हा बँकेत (Nashik DCC Bank) साधारण ६२ हजार शेतकऱ्यांचे १४०० कोटी रुपये थकीत असून या शेतकऱ्यांचे सर्व व्यवहार (Bank Transaction) बँकेने बंद केले आहे. तसेच अनेक शेतकऱ्यांवर जप्तीची कारवाई बँक करत आहे. परंतु हे शेतकरी सरकारचे चुकीचे धोरण, नोटाबंदी, बँकेचे चुकीचे व्याजदरामुळे (Loan Interest) थकीत झाले आहे.
ही बाब माजी खासदार राजू शेट्टी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या लक्षात आणून दिली. या शेतकऱ्यांना बँकेच्या कर्जातून मुक्त करायचे असेल तर राष्ट्रीय बँकेप्रमाणे ओटीएस योजना राबवण्याचा आदेश तत्काळ मुख्यमंत्र्यांनी जिल्हा बँकेला द्यावा किंवा या बँकेला स्वतंत्रपणे आर्थिक पॅकेज जाहीर करावे, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी, प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप यांनी मुंबई येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांच्यासोबत जिल्हा बँके संदर्भात बैठक पार पडली. या मागणीला भुसे यांनीदेखील दुजोरा दिला. याबाबत सकारात्मक निर्णय करू, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले.
जिल्हा बँकेने ६२ हजार शेतकऱ्यांवर कर्जवसुलीची कारवाई सुरू केली आहे. शेतकऱ्यांच्या जमिनीचे लिलाव करण्याची प्रक्रिया सुरू झाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीती निर्माण झाली आहे. बँकेची ही दुरवस्था होण्यामध्ये नोटाबंदी, प्रशासनाचा अंनागोंदी कारभार, भ्रष्टाचार कारणीभूत आहे. परंतु या सगळ्यांचा त्रास सर्वसामान्य शेतकऱ्यांना होत असल्याचे जगताप यांनी या वेळी सांगितले.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.