
यवतमाळ : ग्रामीण भागात यावर्षी कापसाच्या उत्पादनात (Cotton production) निम्म्याने घट झाली आहे. शेतकऱ्यांनी दरवाढीच्या आशेने कापसाची विक्री थांबविली आहे. परिणामी बाजारातील आवक मंदावली आहे. कापसाची वेचणी करून साठवणूक केली जात आहे. विविध संघटनांच्या कापूस दरवाढीच्या आंदोलनामुळे भाववाढीची आशा असल्याने शेतकऱ्यांनी कापसाची विक्री ठप्प केली आहे.
खरीप हंगामाच्या सुरुवातीला बोगस बियाणे व रासायनिक खताचा तुटवडा या अडचणींचा सामना करत कापूस लागवड झाली होती. कापसाचे पीक जोमात असताना मध्यंतरीच्या काळात पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांना फटका बसला. यामुळे कापसाचे उत्पादन निम्म्याने घटले आहे. शेतकरी अडचणीत सापडला आहे.
सध्या वेचणीचे कामे सुरू आहेत. मात्र, दर ९००० रुपयांवर असल्याने बाजारात विक्रीला येणाऱ्या कापसाची आवक मंदावली आहे. काही भागांत कापसाचे दर नऊ हजार १५० रुपयांपर्यंत गेले. काही दिवसात वाढलेले दर नऊ हजारांच्या आत आले. त्यामुळे शेतकऱ्यांनी कापूस विकण्याऐवजी घरात साठवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे.
कापसाचे दर कमी आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे दर वाढले. मात्र, अजूनही येथील व्यापाऱ्यांनी दर वाढविलेले नाहीत. त्यामुळे सध्या कापूस विकणार नाही.- रामेश्वर गावंडे, शेतकरी, दारव्हा.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.