
किल्लेधारूर, जि. बीड ः पाण्याच्या उपलब्धतेमुळे रब्बी हंगाम (Rabi Season) यंदा जोरात आला आहे. पेरणी (Rabi Sowing) होऊन ६० ते ७० दिवसांचा कालावधी उलटला असून ज्वारी दाणे भरण्याच्या अवस्थेत आहे. तर गहू ओंब्या (Wheat) सोडत आहे. हरभरा (Chana) घाटे भरण्याच्या अवस्थेत आहे.
काही भागांत ज्वारीवर लष्करी अळी तर काही ठिकाणी हरभऱ्यावर घाटे अळीचा प्रादुर्भाव दिसून आला आहे. मात्र शेतकऱ्यांनी वेळीच उपाययोजना केल्याने पिके जोमात आहेत.
यावर्षी तालुक्यात १७ हजार हेक्टरवर रब्बीची पेरणी झाली असून राजमा पिकाची ६७० हेक्टरवर शेतकऱ्यांनी पेरणी केली आहे.
यावर्षी झालेल्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम हातचा गेला, मात्र जोरदार झालेल्या परतीच्या पावसाने पाण्याची मोठी उपलब्धी झाली.
यामुळे रब्बी हंगामात मोठ्या प्रमाणात पेरा झाला आहे. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा ज्वारीचा पेरा घटला असल्याचे चित्र आहे. तर हरभऱ्याचे क्षेत्र वाढले आहे.
मागील चार-पाच वर्षांच्या तुलनेत करडईच्या पेऱ्यात वाढ झाली आहे. दरम्यान आठ दिवसांपासून मोठ्या प्रमाणात थंडीचा जोर वाढलेला असून रब्बी पिकांना या थंडीचा फायदा होत आहे. पिके बहरात आली आहे.
पिकांसाठी सध्या परिसरात मुबलक पाणी उपलब्ध असल्याने सध्या सर्वच शेतकरी पिकांना पाणी देण्याच्या कामात व्यस्त आहेत.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.