
नंदुरबार ः जास्तीचे उत्पादन व दर्जेदार पीक येण्याचे आमिष दाखवीत सुरत (Surat) येथील एका कंपनीने बोगस बियाणे (Bogus Seed) विक्री करून शेतकऱ्याची फसवणूक केल्याचा प्रकार नंदुरबारमधील येथे समोर आला. याबाबत कृषी विभागाने (Agricultural Department) पंचनामा (Panchnama) केला. शेतकऱ्याला भरपाईची प्रतीक्षा आहे.
नंदुरबार तालुक्यातील चौपाळे येथील हिंमतराव गंगाराम माळी हे बागायतदार शेतकरी आहेत. गेल्या काही वर्षांपासून माळी हे सुरत येथील एका कंपनीचे काकडी बियाणे खरेदी करून उत्पादन घेतात.
या वर्षीदेखील हिंमतराव माळी यांनी काकडी पिकाची लागवड करण्यासाठी नंदुरबार येथील न्यू विलास ॲग्रो ट्रेडर्स या विक्रेत्याकडून काकडीचे बियाणे घेतले.
बियाणे सुरत येथील एका कंपनीचे होते. त्याची शेतात लागवड केली; परंतु उत्पादनात काकडीचा वेगळाच रंग आला, चवदेखील हवी तशी नाही.
माळी यांना अपेक्षित उत्पादनदेखील आलेले नाही. त्यामुळे त्यांना उत्पादनात मोठा फटका बसला. कंपनीकडून फसवणूक झाल्याचे लक्षात येऊन त्यांनी बियाणे विक्रेत्याकडे तक्रार केली. पण तेथे प्रतिसाद मिळाला नाही.
यानंतर माळी यांनी नंदुरबार तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार केली. तक्रारीची दखल घेत कृषीच्या अधिकाऱ्यांनी चौकशी केली असता तक्रारीत तथ्य आढळले.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.