कुरुळी, जि. पुणे ः खेड तालुक्याच्या महाळुंगे-इंगळे परिसरातील कुरुळी, मोई, निघोजे औद्योगिक क्षेत्र (Industrialization) वाढले असल्यामुळे शेतीकामांसाठी मजूरटंचाई (Labor Shortage) जाणवत आहे. या परिसरात स्थानिकांना रोजगार मिळतील अशा कंपन्या आहेत. त्यामुळे बैठे काम आणि चांगला पगार असल्याने कंपन्यांकडे ओढ वाढू लागली आहे.
यंदा परतीच्या पावसाने या परिसराकडे पाठ फिरवली. त्यामुळे उपलब्ध पाणी साठ्यावर शेतकरी आपल्या कुटुंबासह पहाटेपासून सायंकाळी उशिरापर्यंत शेतात कांदा लावणीचे (Onion Cultivation) काम करतानाचे चित्र दिसत आहे. शेतकऱ्यांना कसेबसे हाताशी येणारे पीक सांभाळण्यासाठी आता मजुरांची टंचाई जाणवू लागली आहे.
शेतात उन्हात, चिखलात, पावसात काम करावे लागते. कामाचे तासही ठरलेले नसतात. त्या तुलनेत शेतीकामात मोबदला कमी मिळतो. त्यामुळे मजुरांनी शेतीकामांकडे पाठ फिरवली आहे.
आधुनिक उत्पादने करणाऱ्या कंपन्यांमध्ये नियमित रोजगार मिळत असल्याने मजुरांचा ओढा तिकडे असतो. त्यामुळे मजूर औद्योगिक क्षेत्रात कामाला जाण्याकडे वळत आहेत. मात्र मंजूर मिळत नसल्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे, असे शेतकरी चंद्रकांत इंगवले यांनी सांगितले.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.