
Jalgaon News : जिल्ह्यात पाणीटंचाईच्या झळा सुरू झाल्या आहेत. अतितापमानाने धरणातील पाणीसाठा दिवसेंदिवस कमी होत आहे. दुसरीकडे भूगर्भातील पाणीपातळी खालावत आहे. सध्या जिल्ह्यात नऊ गांवाना दहा टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.
जिल्ह्यात टंचाईग्रस्त भागासाठी जिल्हा प्रशासनाने यापूर्वीच दोन कोटी ४४ लाख ६९ हजारांचा टंचाई आराखडा तयार केला आहे. त्यानुसार पाणीटंचाईवर उपाययोजना सुरू आहेत.
टंचाईग्रस्त गावे व टँकरची संख्या अशी
मोरगाव, रोटवद, नेरी दिगर (ता. जामनेर) - तीन
तळबंदतांडा, वसंतवाडी (ता. भडगाव) - दोन
एनगाव (ता. बोदवड) - एक
हनुमंतखेडा, खेडीढोक - दोन
मौजे पिंपळगाव (ता. चाळीसगाव) - दोन
मौजे हातगाव भिल्ल वस्ती (ता. चाळीसगाव)
मौजे लोणवाडी बुद्रुक (ता. जळगाव) अशा दोन ठिकाणी तात्पुरत्या पाणीपुरवठा योजना तयार करण्यात आल्या आहेत.
पावसाळ्यात समस्या आणखी वाढणार
साधारणतः पाणीटंचाई आराखडा मार्च ते जूनपर्यंत तयार केला जातो. कारण जूनमध्ये पाऊस पडून पाणीटंचाई कमी होते, असे गृहीतक आहे. मात्र यंदा ‘अल निनो’च्या प्रभावामुळे तापमानात वाढ होईल, सोबतच पावसाळाही लांबेल अशी चिन्हे आहेत.
त्यामुळे जिल्हा प्रशासनाने खास बाब म्हणून एक कोटी ९७ लाख ९३ हजारांचा विशेष टंचाई आराखडा तयार करून ठेवला आहे. जूननंतर जर पाऊस झाला नाही तर या आराखड्यातील तरतुदीतून पाणीपुरवठ्याची व्यवस्था केली जाणार आहे.
धरणाचे नाव यंदाचा पाणीसाठा टक्के २०२२ मधील जलसाठा
हतनूर ५३.०४ ५२.९४
गिरणा २९.२४ ४५.७८
वाघूर ७१.०४ ८०.२७
मन्याड १७.९८ २२.९२
बोरी ५.०१ १७.७८
भोकरबारी ३.२९ ३१.७१
सुकी ६७.९५ ६४.९५
अभोरा ६७.३२ ६५.६६
अग्नावती १६.५७ २६.१६
तोंडापूर ४७.५९ ४७.५९
हिवरा २१.९२ १७.९९
मंगरूळ ५२.४१ ४८.४६
बहुळा ३०.३४ ४३.६८
मोर ६९.६० ७०.१५
अंजनी ३३.३४ ४८.८०
गूळ ६९.९० ५९.२२
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.