Jamnear Irrigation News : गावासह अजिंठा लेणीला पाणीपुरवठा (Water Supply) करणाऱ्या तोंडापूर मध्यम प्रकल्पात सतत पाच दिवसांपासून पडणाऱ्या जोरदार अवकाळी पावसामुळे पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. प्रकल्पात आजरोजी ४५ टक्के साठा झाला आहे.
तोंडापूर परिसरात गेल्या पाच दिवसांपासून चक्रीवादळ गाराच्या मारासह जोरदार पाऊस पडत असल्याने नदी-नाले तुडुंब भरून वाहत आहेत.
जोरदार हवा व गाराच्या माराने कांदा केळी व काही प्रमाणात मक्याच्या पिकाचे तर घरावरील पत्रे उडाल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
सतत पाच दिवसांपासून पडणाऱ्या पावसामुळे शेतकरी हैराण झाला आहे. शेतातील कामाला ब्रेक लागला आहे. मात्र अजिंठा डोंगररांगांमधील नद्यांच्या पुराच्या पाण्याने भर उन्हाळ्यात धरणाची पातळी ४० टक्क्यांवरून ४५ टक्के झाली आहे.
धरणाची पाणी पातळी वाढ झाल्याने व परिसरातील नदी नाल्यात पाणी साचल्याने विहिरी, बोअरवेलच्या पाणी पातळीत ही वाढ झाली आहे. जमिनीत थंडावा निर्माण झाला आहे.
पातळीत वाढ झाल्याने मे महिन्यात येणाऱ्या पाणीटंचाईच्या समस्येचा सामना करावा लागणार नाही. याच मध्यम प्रकल्पातून अजिंठा लेणी, फर्दापूर, वाकडी व तोंडापूरला पाणीपुरवठा केला जातो.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.