
Kannad News : बारामती ॲग्रो साखर कारखाना (Baramati Agro Sugar Factory) ऊस उत्पादक शेतकरी आणि कामगारांचे जास्तीत जास्त हित जपत आहे. ही बांधिलकी लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी आमच्या कारखान्याला ऊस द्यावा असे आवाहन कारखान्याचे उपाध्यक्ष सुभाष गुळवे यांनी केले आहे.
बारामती ॲग्रो साखर कारखाना येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते पुढे म्हणाले की, कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र पवार, संचालक रोहीत पवार यांच्या मार्गदर्शनाखाली या वर्षीच्या गळीत हंगामातील गाळपाचे एकशे एकोणीस दिवस यशस्वीरीत्या पूर्ण झाले आहेत.
सात लाख चार हजार टन ऊस गाळप झाले आहे. यंदा दिडशे दिवसांचा गळीत हंगाम आहे. मार्च अखेरपर्यंत कारखाना सुरू राहणार आहे.
विशेष म्हणजे कारखान्याने ११.४० सरासरी रिकव्हरी मिळविली आहे. आगामी काळात मनुष्यबळाचा विचार करता अद्ययावत तंत्रज्ञान वापरून ऊस तोडणी करण्यात येणार आहे. उसाच्या क्षेत्रात वाढ होण्यासाठी कारखाना शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत व मार्गदर्शन करणार आहे.
दिवाळीपूर्वी व जूनमध्ये शेतकऱ्यांना पैसे देण्यात येणार आहेत. कामगारांनाही नियमित वेतन देण्यात येत आहे. शेतकरी आणि कामगार यांचे हित जपून कारखान्याने विश्वास निर्माण केला आहे.
शेतकऱ्यांनी ऊस याच कारखान्याला द्यावा, असे आवाहनही त्यांनी केले. व्यवस्थापक मिलिंद देशमुख, संजय सस्ते, आसिफ खान पठाण, सतीश तेलहंडे आदींची उपस्थिती होती.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.