
Amravati News : यंदाच्या खरीप हंगामात (kharif Season) जून ते ऑगस्टदरम्यान सततच्या पावसामुळे चांदूरबाजार तालुक्यातील दोन मंडळांसह राज्यभरातील शेकडो तालुक्यात शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान (Crop Damage) झाले. याची नुकसान भरपाई (Compensation) मिळण्यासाठी आमदार बच्चू कडू (Bacchu kadu) यांनी सातत्याने मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा केला.
त्यानुसार मुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली शासनाने एक समिती स्थापन केली आहे. या समितीच्या अहवालानंतर नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई भेटण्याची शाश्वती निर्माण झाली आहे.
तालुक्यातील आसेगाव व तळेगाव मोहना महसूल मंडळात ऑक्टोबर २०२१, डिसेंबर २०२१, जानेवारी २०२२ मध्ये सततचा व अवकाळी पाऊस तसेच गारपीट झाली.
त्यानंतर जुलै- ऑगस्ट २०२२ च्या सततच्या पावसामुळे शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले होते. महसूल मंडळ तळेगाव मोहना व आसेगाव येथील स्वयंचलित हवामान केंद्राची पावसाची आकडेवारी ग्राह्य न धरण्याबाबत जिल्हाधिकारी, अमरावती यांना २१ सप्टेंबर २०२२ च्या पत्रान्वये प्रस्ताव सादर केला होता.
तथापि जिल्हाधिकारी, अमरावती यांनी १७ फेब्रुवारी २०२३ च्या पत्रान्वये सुधारित प्रस्ताव विभागीय आयुक्त, अमरावती यांच्याकडे सादर केला आहे.
विभागीय आयुक्त, अमरावती यांच्याकडून शासनास प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर त्या दोन्ही मंडळांच्या शेजारील महसूल मंडळातील पर्जन्यमापक यंत्राची आकडेवारी ग्राह्य धरून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी.
याकरिता मदत देण्याबाबत कृषी विभागामार्फत अपर मुख्य सचिव (नियोजन) यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली. त्या समितीच्या शिफारशीनंतर शेतकऱ्यांना लवकरच नुकसानभरपाई मिळणार आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.